Mohammad Shami: बुमराहला दुखापत झाल्यानंतरही टीममध्ये निवडलं नाही, अखेर मोहम्मद शमीने सोडलं मौन, मनातलं बोलून दाखवलं

श्रीलंका मालिकेसाठी बुमरहाच्या जागी जम्मू आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीला पहिल्यांदाच भारतीय वरिष्ठ संघात स्थान मिळाले आहे. पण बुमराह मालिकेतून बाहेर पडल्यावर मोहम्मद शमी संघात येईल अशी चर्चा रंगली होती, पण असे काहीच झाले नाही. यावर मोहम्मद शमीने आता एक विधान केले आहे.

Mohammad Shami: बुमराहला दुखापत झाल्यानंतरही टीममध्ये निवडलं नाही, अखेर मोहम्मद शमीने सोडलं मौन, मनातलं बोलून दाखवलं
| Updated on: Aug 05, 2026 | 12:09 PM

भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज, जसप्रीत बुमराह, गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरू न शकल्यामुळे श्रीलंकेच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे, सुरुवातीला त्याला संघात स्थान मिळाले होते पण आता त्याला दुखापतीमुळे संघातून बाहेर पडावे लागले. बुमरहाच्या जागी जम्मू आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीला पहिल्यांदाच भारतीय वरिष्ठ संघात स्थान मिळाले आहे. वरिष्ठ राष्ट्रीय संघात स्थान मिळवणारा नबी हा जम्मू आणि काश्मीरचा तिसरा खेळाडू असेल. यापूर्वी परवेझ रसूल आणि उमरान मलिक यांना भारतीय मर्यादित षटकांच्या संघात बोलावण्यात आले होते. कसोटी संघात स्थान मिळवणारा आकिब हा पहिला खेळाडू बनला आहे. पण बुमराह मालिकेतून बाहेर पडल्यावर मोहम्मद शमी संघात येईल अशी चर्चा रंगली होती, पण असे काहीच झाले नाही. यावर मोहम्मद शमीने आता एक विधान केले आहे.

शमीने मौन सोडले. तो म्हणाला, “मी सुद्धा खूप मेहनत करत आहे. मी विश्वचषकासाठी सतत प्रयत्न करत आहे आणि तयारी करत राहिन. मला विश्वचषक संघात स्थान मिळवायचे आहे आणि त्यासाठी मी कसून सराव करत आहे. मी याआधीही सांगितले आहे की मी प्रयत्न करत राहीन; मला संघात घ्यायचे की नाही हे ठरवणे निवड समितीचे काम आहे.”

शमीने 2025 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे शेवटचे प्रतिनिधित्व केले होते आणि 2023 पासून तो संघासाठी एकही कसोटी सामना खेळलेला नाही. भारतासाठी त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध होता. सुरुवातीला फिटनेसच्या समस्यांमुळे शमीला संघातून वगळण्यात आले होते, परंतु गेल्या वर्षभरात देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करूनही, त्याच्या संघात परतण्याची शक्यता निर्माण झाली नाही. शमी यावर्षी 36 वर्षांचा होईल आणि जसप्रीत बुमराहऐवजी आकिब नबीची निवड हा बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा त्याला दिलेला अखेरचा संदेश असू शकतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करूनही, गेल्या वर्षभरात शमीचा निवडीसाठी विचार केला गेला नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us