Suryakumar Yadav: जय शहांचा मला फोन आला आणि अचानक…कॅप्टन्सी गेल्यानंतर सूर्यासोबत काय घडलं?
Suryakuma Yadav News: सूर्यकुमार यादवला अचानक कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आले आहे. आता यानंतर त्याला काय वाटले हे त्याने बोलून दाखवले.

टीम इंडियाचा वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन सूर्यकुमार यादवला अचानक संघातून वगळल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता. आता यावरच सुर्याने एक विधान केले आहे ज्याची सर्वत्र चर्चा रंगत आहे.
"माझी कॅप्टन्सी गेली, ही घटना मला चित्रपटासारखी वाटली. जर गोष्टी तुमच्या मर्जीप्रमाणे होत नसेल तरी सुद्धा काहीच हरकत नाही. तुम्हाला पुन्हा सराव करण्याची संधी तर मिळतेच. त्यामुळे चिंता करण्याची कोणतेच कारण नाही. मी तीही परिस्थिती मान्य केली. "
"आयपीएलनंतर माझ्यावर कोणत्याच गोष्टीचा फरक पडला नाही. कॅप्टन्सी गेल्यानंतर मला प्रश्न पडला होता की, असे कसे होऊ शकते. पण तुम्हाला उत्तरे आपोआप मिळत जाते. ज्या गोष्टी तुमच्या हातातच नाही त्या गोष्टींची काळजी करण्यात काही अर्थ नाही." असे सूर्या स्पष्ट म्हणाला.
"मला तेव्हा जय शहा यांचा फोन आला होता, ते तेव्हा बीसीसीआयचे चेअरमन होते, त्यांनी मला फोनवर सांगितले की, "आम्ही तुला कॅप्टन करायचे ठरवले. त्यावेळी रोहित शर्मा, राहुल द्रविड, अजित आगरकर आणि इतरांनी मिळून हा मी कर्णधार बनावा असा निर्णय घेतला होता. " असं सूर्या म्हणाला.
कॅप्टन्सी गेल्यानंतर मी काहीही केलेले नाही. मी घरीच होतो. 5 ते 6 आठवडे मी काहीही केलेले नाही. मला संधीची वाट पहायला आवडते. कधीही संधी मिळू शकते, त्यामुळे क्रिकेटचा सराव चालू ठेवणे गरजेचे आहे."