कांदा आणि लसूण न खाणारं गाव!

एका गावाबद्दल सांगणार आहोत जिथे गेल्या 40 ते 45 वर्षांपासून लसूण-कांद्याचा वापर होत नाही. गावात असलेल्या सर्व घरांमध्ये लोक लसूण-कांदा खाण्यापासून अंतर ठेवतात.

कांदा आणि लसूण न खाणारं गाव!
onion and garlic
Image Credit source: Social Media
Rachana Bhondave | Updated on: Jan 26, 2023 | 5:10 PM

कांदा आणि लसूण यांच्या घसरत्या किमतींमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. बहुतेक घरांमध्ये त्यांचा वापर केला जातो. कांदा-लसूण वापराने जेवणाची चव वाढते. याचा शरीराच्या प्रतिकारशक्तीवर प्रचंड परिणाम दिसून येतो आणि हंगामी आजारांचा धोका कमी होतो. इतके फायदे असूनही अनेक जण ते टाळतात, पण आज आम्ही तुम्हाला अशा एका गावाबद्दल सांगणार आहोत जिथे गेल्या 40 ते 45 वर्षांपासून लसूण-कांद्याचा वापर होत नाही. गावात असलेल्या सर्व घरांमध्ये लोक लसूण-कांदा खाण्यापासून अंतर ठेवतात. त्याची इतकी भीती असते की ते बाजारातून विकतही घेत नाहीत.

येथे उल्लेख केलेले गाव बिहारमधील जहानाबादजवळ आहे. हे गाव जहानाबाद जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे, जे त्रिलोकी बीघा गाव म्हणून ओळखले जाते, जे चिरी पंचायतीअंतर्गत येते. या गावात सुमारे 30 ते 35 घरे असून येथील सर्व घरांमध्ये कांदा-लसूण खाण्यास स्पष्ट मनाई आहे. इथले सर्व लोक कांदा-लसूण शिवाय जेवण करतात.

त्रिलोकी बिघा गावातील ज्येष्ठ सांगतात की, सुमारे 40 ते 45 वर्षांपूर्वी या गावातील लोकांनी कांदा-लसूण खाणं बंद केलं होतं आणि इथले लोक ही परंपरा फार पूर्वीपासून पाळत आहेत. गावातील ज्येष्ठांच्या म्हणण्यानुसार गावात ठाकुरबारीचे मंदिर असून ते वर्षानुवर्षे जुने आहे.

या मंदिरामुळे लोक लसूण आणि कांद्यापासून दूर झाले आहेत. अनेकांनी ही परंपरा मोडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांच्या घरात अनेक प्रकारच्या अप्रिय घटना पाहायला मिळाल्या. या घटनांनंतर इथल्या लोकांनी लसूण-कांदा खाणं तर बंद केलंच पण बाजारातून आणणंही बंद केलं.

फक्त लसूण आणि कांदाच नाही तर मांस आणि दारू सारख्या गोष्टींना या गावात सक्त मनाई आहे. इथे तुम्हाला कोणी दारू पिताना दिसणार नाही आणि इथल्या लोकांनी मांसाहारही सोडला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us