एकनाथ शिंदे यांनी वरळीतून लढावं, नाहीतर… आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी लावून ठरली. इतकंच नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवावी, नाहीतर मी ठाण्यातून निवडणूक लढणार असल्याचं आव्हानच ठाकरेंनी दिलं
नागपूर, १५ डिसेंबर २०२३ : घटनाबाह्य सरकारला गेल्या वर्षभरापासून सांगतोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी लावून ठरली. इतकंच नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवावी, नाहीतर मी ठाण्यातून निवडणूक लढणार असल्याचं आव्हानच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आव्हान दिल्यानंतर आदित्य ठाकरे ठाण्यातून निवडणूक लढवमार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. यापूर्वीही अनेकदा सांगितलं आज पुन्हा सांगतो तुम्ही वरळीत या मी ठाण्यात येतो. होऊन जाऊ द्या… असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आदित्य ठाकरे यांनी पुन्हा डिवचलं आहे. तर आपल्या राज्यात लोकशाही मारलेली आहे. आज निवडणूका होत नाही याला आपण लोकशाही म्हणतो का? मी मुख्यमंत्र्यांना अनेकदा सांगितलं तुम्ही पदाचा राजीनामा द्या आणि माझ्यासमोर वरळीतून लढा नाहीतर मी तुमच्यासमोर ठाण्यातून लढतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर

