कांद्यानं दिल्लीचं सरकार गेलं, अजित पवार यांनी लोकांना का करून दिलं आठवण
कांद्याच्या दरावरूनच दिल्लीचं सरकार गेलं होतं. आपल्याकडे जे सध्या सुरू आहे तसेच कांद्याच्या दरावर तेथे सुरू होतं आणि दिल्लीचं सरकार गेलं.
अहमदनगर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अहमदनगरमध्ये बोलताना कांद्यानं दिल्लीचं सरकार घालवल असं म्हणत थेट इशारा देत जनता सरकार घालवू शकते, सरकार बदलू शकते असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी कांद्याचा तर वांदाच झाला आहे. आपल्याकडेही जिरायत शेती होते तेथे कांदा मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो. दोन पैसे मिळवून देणारं पिक म्हणून याकडे पाहिलं जातं. त्यावरूनच सांगतो दिल्लीचं सरकार गेलं होतं. आपल्याकडे जे सध्या सुरू आहे तसेच कांद्याच्या दरावर तेथे सुरू होतं आणि दिल्लीचं सरकार गेलं. म्हणजे लोकांनी मनात आणलं तर सरकार घालवू शकतात. एवढी ताकद मतदाराच्या मतात आहे असेही अजित पवार म्हणाले.
Published on: Mar 07, 2023 04:58 PM
Follow Us
Latest Videos
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
