AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patole Uncut | मी गोंधळ घालण्यात एक्सपर्ट, बारा बलुतेदारांमध्ये ती ताकद नाही का? - नाना पटोले

Nana Patole Uncut | मी गोंधळ घालण्यात एक्सपर्ट, बारा बलुतेदारांमध्ये ती ताकद नाही का? – नाना पटोले

| Edited By: | Updated on: Jun 27, 2021 | 8:12 PM
Share

मी गोंधळ घालण्यात एक्सपर्ट आहे. ओबीसींच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून मी गोंधळ घातला. तेव्हा 2001-02 मध्ये दहावीच्या मुलांना शिष्यवृत्ती सुरु झाली. विधानसभेचा अध्यक्ष असतानाही मोर्चे काढले. जेव्हा समाजाचा प्रश्न येतो तेव्हा रस्त्यावर उतरलो.

नागपूर : लोणावळ्यातल्या ओबीसी व्हीजेएनटी चिंतन मंथन शिबीरात नाना पटोलेंची हजेरी विशेष होती. एरवी ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून जास्त दिसतात पण आज त्यांनी ओबीसीच्या मुद्द्यांना हात घालत, गरज पडली तर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात केंद्राकडे जाऊ असं म्हणाले. विशेष म्हणजे ओबीसींची जनगणना राष्ट्रीय पातळीवर व्हायला हवी आणि केंद्र हवी ती आकडेवारी देत नाही, असा आरोपही यावेळेस नाना पटोले यांनी केला. (Congress State President, nagpur, nana patole, OBC Chintan meet, OBC Reservation)

मी गोंधळ घालण्यात एक्सपर्ट!

नाना पटोले हे काँग्रेसचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. भाजपाकडून खासदार झाले तर त्यांनी मोदींचा विरोध करत पक्ष सोडला. नंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. आताही महाविकास आघाडीत त्यांच्या आक्रमकपणामुळे अनेकदा अस्वस्थता पसरते. पण त्यांचा आक्रमकपणाच काँग्रेसला चांगले दिवस आणून देईल असं जाणकारांना वाटतं. ओबीसीच्या चिंतन शिबिरातही पटोलेंनी स्वत:च्या आक्रमकतेची कबुली दिली. ते म्हणाले- पद एकाला तर त्याचे अधिकार दुसऱ्याकडे असतात, हे आपण बऱ्याचदा बघितलं. आपल्याला संविधानीक पदं मिळाली, पण ती जाण्याच्या भीतीनं लोक भूमिका मांडत नाहीत. इतिहास लपवला जातो पण वास्तविकता मांडण्याची हीच वेळ आहे. मी लहान होतो, तेव्हा कपड्याला पैसे नसायचे, तेव्हाच एससी, एसटीच्या मुलांना नविन कपडे मिळायचे, पुस्तकं मिळायची. ओबीसीच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून मी आमदार झाल्यावर प्रयत्न केले. मी गोंधळ घालण्यात एक्सपर्ट आहे. ओबीसींच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून मी गोंधळ घातला. तेव्हा 2001-02 मध्ये दहावीच्या मुलांना शिष्यवृत्ती सुरु झाली. विधानसभेचा अध्यक्ष असतानाही मोर्चे काढले. जेव्हा समाजाचा प्रश्न येतो तेव्हा रस्त्यावर उतरलो.

बारा बलुतेदारांमध्ये ती ताकद नाही का?

नाना पटोले यावेळेस म्हणाले की, ओबीसींची जनगणना राष्ट्रीय पातळीवर व्हायला हवी. नेमकी आकडेवारी किती हे केंद्र देत नाही. आता आयोग म्हणते कोरोना आहे, इम्पेरीकल डाटा गोळा कसा करायचा. इम्पेरीकल डाटा गोळा केंद्राने करावं की राज्याने करावं हा राजकीय मुद्दा आहे असही पटोले म्हणाले. मोदींवर टीका करताना काही लोकं संविधानापेक्षा स्वत:ला मोठं समजतात, त्याचे फळं आपल्याला भोगावे लागतात असही म्हणाले. आपण एकत्र राहिले तर कुणीच बिघडवू शकत नाही. आज एससी, एसटीचं आरक्षण काढलं तर ते सरकार विरोधात रस्त्यावर उतरतात, आपल्या बारा बलुतेदारांमध्ये ती ताकद नाही का? असा सवालही यावेळेस पटोलेंनी उपस्थित केला.

संबंधित बातम्या :

‘सारथीला मिळतील तेवढेच पैसे महाज्योतीला मिळणार, मी बसलोय इथे’, मंत्री विजय वडेट्टीवारांचा विश्वास

इम्पेरिकल डाटा हा राज्य सरकारचाच विषय, ओबीसी चिंतन बैठकीत पंकजा मुंडेंचा पुनरुच्चार

(Congress State President, nagpur, nana patole, OBC Chintan meet, OBC Reservation)

Published on: Jun 27, 2021 08:12 PM