Vijay Wadettiwar चंद्रपूर दौऱ्यावर, नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी शेतात पोहोचले-tv9
ब्रह्मपुरी तालुक्यात किमान 25 हाडा हजार हेक्टर जमीन ही धानाची असून त्यापैकी किमान 18 हजार हेक्टर जमीन ही पूर्ण खराब झाली आहे. अतिवृष्टीमुळे आणि आलेल्या पुरामुळे शेती नष्ट झाली आहे.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. याप्रश्नावर पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी विरोधकांनी सरकारला घेण्याचा प्रयत्न केला. तसेच शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यादरम्यान आमदार विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर दौऱ्यावर आहेत. पाहणीनंतर विजय वडेट्टीवार म्हणाले, ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त झाल्याची सध्याची स्थिती आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात किमान 25 हाडा हजार हेक्टर जमीन ही धानाची असून त्यापैकी किमान 18 हजार हेक्टर जमीन ही पूर्ण खराब झाली आहे. अतिवृष्टीमुळे आणि आलेल्या पुरामुळे शेती नष्ट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असून तो चिंताग्रस्त आहे.
Published on: Aug 21, 2022 11:29 AM
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
