AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!

इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!

| Updated on: Jun 08, 2026 | 6:40 PM
Share

इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक राजधानी दिल्लीत पार पडली. या बैठकीत काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना तसेच इतर प्रमुख विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. बैठकीत देशातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. खासदार संजय राऊत यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना महत्त्वाची माहिती दिली.

इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक राजधानी दिल्लीत पार पडली. या बैठकीत काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना तसेच इतर प्रमुख विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. बैठकीत देशातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. खासदार संजय राऊत यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना महत्त्वाची माहिती दिली.

या बैठकीत भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पत्रात SIR आणि NEET पेपरफुटी प्रकरणाचा उल्लेख करण्यात येणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच महागाई, बेरोजगारी आणि घोटाळ्यांवरही विरोधकांनी चिंता व्यक्त केली.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत महत्त्वाची भूमिका मांडली. इंडिया आघाडीने पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करावा, असे त्यांचे मत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. लोकांसमोर नेतृत्व करणारा चेहरा स्पष्टपणे मांडला पाहिजे, असेही ठाकरे यांनी बैठकीत नमूद केले. आगामी ऑगस्ट महिन्यात पुन्हा इंडिया आघाडीची बैठक होणार असल्याची माहितीही देण्यात आली.

Published on: Jun 08, 2026 06:40 PM

Follow Us