Saifullah Kasuri : ‘मैंने नहीं कराया, भारत जंगी दुश्मन…’, पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला कसुरीचा कांगावा, व्हिडीओ व्हायरल
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. 'पहलगाममधील हल्ला भारतानेच घडवून आणला असून त्याला तो जबाबदार असल्याचे कसुरीचे म्हणणे आहे. हे त्याचे कारस्थान आहे. पाकिस्तानचा याच्याशी काहीही संबंध नाही.'
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला. यामागे लष्कर-ए-तैयबाचा डेप्युटी कमांडर सैफुल्लाह कसुरी असल्याचे बोलले जात आहे. भारताच्या कारवाईनंतर कसुरी यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी हल्ल्याचा निषेध केला असून याला आपण जबाबदार नसल्याचे म्हटले आहे. जम्मू काश्मीर येथील श्रीनगरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला कसुरीचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला कसुरीने कांगावा केल्याचे पाहायला मिळत आहे. पहलगाम हल्ल्याशी कोणताही संबंध नसल्याचे हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला कसुरीने म्हटलं आहे. इतकंच नाहीतर सौफुल्ला कसुरीकडून भारताचा दुश्मन असा उल्लेखही यावेळी करण्यात आला.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बुधवारी रात्री झालेल्या CCS बैठकीत भारताने पाच मोठे निर्णय घेतले. यामध्ये सिंधू जल करार थांबवण्यासह अनेक कठोर पावले उचलण्यात आली. यानंतर लष्कर-ए-तैयबाचा डेप्युटी कमांडर सैफुल्ला कसुरी याने एक निवेदन जारी केले आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. हे भारताचे षड्यंत्र असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

इशारा ही काफी है... भारत पुढील मिशनसाठी सज्ज, बघा 10 महत्त्वाचे मुद्दे

शत्रूला जवळ येऊ न देता नौदलासह हवाई दलाने..व्हाइस अॅडमिरल ए.एन.प्रमोद

पाकिस्तानचा पापाचा घडा भरला होता - लेफ्टनंट जनरल राजीव घई

पाकिस्तानात झालेल्या नुकसानासाठी ते स्वत:च जबाबदार - ए. के. भारती
