लता मंगेशकर महान आत्मा, त्यांच्या स्मारकावरुन राजकारण नको – संजय राऊत
गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनानंतर आता त्यांच्या स्मारकाचा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनानंतर आता त्यांच्या स्मारकाचा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार राम कदम (ram kadam) यांनी शिवाजी पार्कातच लता मंगेशकर यांचं स्मृती स्थळ उभारण्याची मागणी केली आहे. राम कदम यांनी त्याबाबतचं पत्रंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना लिहिलं आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लतादीदींच्या स्मारकाबाबत राजकारण करू नये. लतादीदी या महान व्यक्तिमत्व होत्या. त्यांचं स्मारक उभारणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी केंद्र सरकारनेच विचार केला पाहिजे, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं.
Published on: Feb 07, 2022 01:24 PM
Follow Us
Latest Videos
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
