Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यव्यापी दौऱ्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगे यांच्या दौऱ्याचा उद्देश समाजामध्ये तेढ निर्माण करणे असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यव्यापी दौऱ्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगे यांच्या दौऱ्याचा उद्देश समाजामध्ये तेढ निर्माण करणे असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
लक्ष्मण हाके म्हणाले की, “मनोज जरांगे यांचा दौरा हा समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आहे. ज्या लोकांची राजकीय गणितं बिघडली आहेत, त्यांच्या राजकीय हिताला फिडिंग करणारा आणि त्यांच्या तालावर नाचणारा हा माणूस आहे,” अशा शब्दांत त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर आरोप केला.
महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही लक्ष्मण हाके यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. “महाराष्ट्रातलं ओबीसींचं आरक्षण एका आंदोलनाला बळी पडून शासनाने संपवलं आहे,” असा दावा त्यांनी केला. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सरकार झुकल्याचा आरोपही हाके यांनी केला.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे सातत्याने सरकारमधील विविध मंत्र्यांवर टीका करत असून, त्यांच्याकडून आक्रमक भाषेचा वापर केला जात असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. “एक माणूस रोज दोन-चार मंत्र्यांवर टीका करतो, शिव्या देतो; मात्र सरकारकडून त्यावर एक शब्दही बोलला जात नाही,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यावरून लक्ष्मण हाके यांनी केलेल्या या आरोपांमुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरचा संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे. हाके यांच्या आरोपांवर मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Published on: Aug 10, 2026 03:49 PM
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं, पोलिसांकडून पाण्याचा मारा
मोठी बातमी! फुटीर खासदारांमध्ये चलबिचल सुरु; ठाकरे गटाच्या नोटीसनंतर..
NEET पेपरफुटीवर सरकारची कोंडी? अमित शाह देणार उत्तर!

