सत्ता संघर्षाच्या निकालावर भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी याचं सुचक वक्तव्य, म्हणाले…
निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अनेक निरीक्षणे नोंदवली. व्हीप, राज्यपालांची भूमिका आणि प्रतोद या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाच्या टिपण्या केल्या. याचवेळी कोर्टाने 16 आमदारांचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला.
मुंबई : राज्याच्या सत्ता संघर्षावर (Maharashtra Politics Crisis) सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अनेक निरीक्षणे नोंदवली. व्हीप, राज्यपालांची भूमिका आणि प्रतोद या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाच्या टिपण्या केल्या. याचवेळी कोर्टाने 16 आमदारांचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. म्हणजे विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याप्रकरणावर निर्णय देणार आहे. त्यामुळे 16 आमदारांचा मुद्दा ही आता निकाली निघणार आहे. याचदरम्यान भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी (Madhav Bhandari) यांनी काल आलेल्या निकालावर सुचक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे भाजमध्येच चर्चा सुरू झाल्या आहेत. यावेळी भंडारी यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि निरीक्षणं या दोन गोष्टी वेगळ्या असतात. त्यामुळे निकाल पत्र पूर्ण पाहिल्याशिवाय त्यांनी निरीक्षणं कोणती आणि निकाल काय? याचा अभ्यास केल्याशिवाय याबद्दल काही बोलणं योग्य होणार नाही असं म्हटलं आहे.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
