राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचं नेमकं काय होणार? तटकरे, प्रफुल्ल पटेलांचा खोडा?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत शरद पवार आणि जयंत पाटलांनी मोठा खुलासा केला आहे. 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची घोषणा होणार होती, असे त्यांनी सांगितले. ही अजित पवारांचीही इच्छा होती, मात्र त्यांच्या निधनानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून विरोध दिसतोय. सुनेत्रा पवारांनी पुढाकार घेतल्यास विलिनीकरण शक्य असल्याचा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरून शरद पवार आणि जयंत पाटलांनी महत्त्वाचे खुलासे केले आहेत. 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही गट एकत्र येऊन विलिनीकरणाची घोषणा करणार होते, असे त्यांनी नमूद केले. या निर्णयासाठी अजित पवारांनी सहमती दर्शवली होती आणि ते स्वतः ही घोषणा 12 फेब्रुवारीला करू इच्छित होते. बारामती येथील गोविंद बाग निवासस्थानी झालेल्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा झाली होती.
मात्र, अजित पवारांच्या अकाली निधनामुळे हा निर्णय प्रत्यक्षात येऊ शकला नाही. आता दादांच्या राष्ट्रवादीकडील नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या प्रतिक्रियांवरून या विलिनीकरणाला विरोध असल्याची चर्चा आहे. विलिनीकरणासाठी कोणतीही अडचण नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. जयंत पाटील यांनी व्यक्त केलेल्या विश्वासानुसार, अजित पवारांची पत्नी आणि आता उपमुख्यमंत्रीपदी असलेल्या सुनेत्रा पवारांनी पुढाकार घेतल्यास विलिनीकरण शक्य होऊ शकते.
विलीनीकरणाचं नेमकं काय होणार? तटकरे, प्रफुल्ल पटेलांचा खोडा?
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, कोणत्या खात्याच्या होणार मिनिस्टर?
पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवारांना दिलेल्या शुभेच्छांवर राऊतांची टीका
सुनेत्रावहिनींचा निर्णय कौतुकास्पद, धाडसी! फडणवीसांकडून ट्विट

