AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून...; मनोज जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका

मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून…; मनोज जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका

| Updated on: Dec 07, 2025 | 4:46 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर चिंता व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कुणबी दाखल्यांची पडताळणी आणि वितरण रखडल्याने त्यांनी नाराजी दर्शवली. नागपूर अधिवेशनात सरकारने ठोस पावले न उचलल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे, तसेच मराठा भवनाचे महत्त्व अधोरेखित केले.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्र्यांनी १५ दिवसांपूर्वी कुणबी प्रमाणपत्र थांबणार नाहीत आणि शिंदे समिती पुन्हा सुरू होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, नोंदी असूनही अनेक मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्रे दिली जात नसल्याबद्दल जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

सरकार आणि काही अधिकारी जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याचा आरोप त्यांनी केला. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सुरू होत असताना, जरांगे पाटील यांनी सरकारकडून ठोस कृतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. जर या अधिवेशनात कुणबी दाखले आणि आरक्षणासंदर्भात अपेक्षित निर्णय झाले नाहीत, तर पुन्हा आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला. त्यांच्या मते, समाजासाठी शिक्षण आणि नोकरीत आरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ते पिढ्यांना उंचीवर नेते. सरकारने आरक्षणाबाबत गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

Published on: Dec 07, 2025 04:46 PM