जरांगे पाटील 4 जूनपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार? मराठा आरक्षणासाठी काय दिली डेडलाईन?
मराठा आरक्षण गोरगरीबांचा लढा आहे. तो आता यशस्वी होणार आहे. मराठा समाजातील गोरगरीब लेकरांच्या बाजूने असल्याचा शब्द मनोज जरांगे पाटलांनी दिलाय. लोकसभेला आमचा कुणालाही पाठिंबा नाही आणि आम्ही आमचा कोणताही उमेदवारही दिलेला नाही, असे म्हटले.
लोकसभेला आमचा कुणालाही पाठिंबा नाही आणि आम्ही आमचा कोणताही उमेदवारही दिलेला नाही. राजकारण हा मार्ग नसल्याने मराठा समाज पुन्हा एकत्र झालाय. राजकारणाच्या निमित्ताने मराठा समाजाचं आरक्षण मागे राहायचं आणि राजकारणचं पुढे यायचं…त्यामुळे आपल्या रक्तात राजकारण असण्यापेक्षा आरक्षण असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मराठा समाजाकडून कोणताच उमेदवार नाही आणि पाठिंबाही नाही. तर निवडणुकीला उभं राहण्यापेक्षा, समाजाने अपक्ष उमेदवारी करण्यापेक्षा पाडण्याचे काम करावे तेव्हा त्यांना मराठ्यांची ताकद समजेल, असे आवाहनच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलंय. तर 6 जूनपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर पुन्हा आंदोलन सुरु आहे. आपण 4 जूनपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहोत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षण गोरगरीबांचा लढा आहे. तो आता यशस्वी होणार आहे. मराठा समाजातील गोरगरीब लेकरांच्या बाजूने असल्याचा शब्द मनोज जरांगे पाटलांनी दिलाय.