पवार यांच्या इशाऱ्यावरून राऊत शिवसेना संपवत आहेत, शिंदे गटातील ‘या’ नेत्याचा खळबळजनक आरोप
निवडणुकीपूर्वी ठाकरे यांचा पक्ष हा रिकामा झाल्याचे पाहायला मिळेल, असा गौप्यस्फोट शिंदे गटाच्या एका खासदाराने केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेला गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. मोठे पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील तूतू-मैंमैं काही केल्या संपायचं नाव दिसत नाही. अशातच निवडणुकीपूर्वी ठाकरे यांचा पक्ष हा रिकामा झाल्याचे पाहायला मिळेल, असा गौप्यस्फोट शिंदे गटाच्या एका खासदाराने केला आहे.
प्रतापराव जाधव यांनी ठाकरे गटावर चांगलाच निशाणा साधत निवडणुकांपूर्वी ठाकरे गटात राहिलेले आमदार आणि खासदार शिंदे गटात येतील, आणि ठाकरे यांचा पक्ष रिकामा होईल,असा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली. तर शरद पवार यांच्या इशाऱ्यावर संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला आहे, असा खळबळजनक आरोप प्रतापराव जाधव यांनी केला आहे. इतकेच नाही तर त्यांनी ठाकरे गटाचा उल्लेख शिल्लक सेना असा करत ठाकरे गटाला डिवचलं आहे.
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री..
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार

