Mumbai Children Hostage : 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काऊंटर, मुंबई हादरली, पवईत घडलं काय?
मुंबईतील पवई येथे १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला आहे. मुलांना वाचवताना आर्याने पोलिसांवर गोळीबार केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सर्व १७ मुलांना सुखरूप वाचवण्यात आले आहे.
मुंबईच्या पवई येथे १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलीस कारवाईदरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित आर्याने मुलांना ओलीस ठेवले होते. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य सुरू असताना, आरोपी रोहित आर्याने पोलिसांवर गोळीबार केला. याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही आर्यावर गोळी चालवली.
रोहित आर्याच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली होती. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सर्व १७ मुलांना आर्याच्या तावडीतून सुखरूप बाहेर काढून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. ही घटना मुंबईतील पवई परिसरात घडली असून, पोलिसांनी यशस्वीपणे मुलांना सुरक्षित केले आहे. पण 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काऊंटर करण्यात आल्याची मोठी माहिती समोर आली आहे.
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी

