Mumbai–Nashik Expressway Traffic : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर ‘विकासा’चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-नाशिक महामार्गावर अवजड वाहन आणि कारच्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रस्त्याच्या मधोमध अडकलेली वाहने बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील तब्बल ३२ तासांच्या वाहतूक कोंडीच्या कटू अनुभवानंतर आता मुंबई-नाशिक महामार्गावरही अशीच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आज मुंबई-नाशिक महामार्गावर एक अवजड वाहन आणि एका कारचा अपघात झाला. या अपघातामुळे दोन्ही वाहने रस्त्याच्या मधोमध आडवी झाल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर याचा थेट परिणाम झाला असून, दृश्यांवरून पाहता वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून, अनेक वाहने गेल्या बऱ्याच वेळेपासून जागेवरच अडकून पडली आहेत. यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अपघातग्रस्त वाहने तात्काळ बाजूला करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती समोर येत आहे, जेणेकरून मार्गावरील वाहतूक पूर्ववत करता येईल. मात्र, ही वाहने रस्त्यावरून हटवल्याशिवाय वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता कमी आहे. या कोंडीमुळे प्रवासासाठी विलंब लागत असून, नागरिकांना नियोजित ठिकाणी पोहोचण्यास अडचणी येत आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावरील प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना या वाहतूक कोंडीची नोंद घ्यावी असे सूचित केले जात आहे.
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....

