शिंदे गट भाजपामध्ये विलीन होणार? राष्ट्रवादी नेत्याचं मोठं वक्तव्य
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आयाराम आणि गयाराम यांची भाजपमध्ये सध्या जोरदार प्रवेश होत आहेत. त्यावरून टीका करताना त्यंनी शिंदे गटाबाबत ही मोठा दावा केला. त्यांनी अनेक लोकं राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले आहेत.
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीतील गेलेल्यआ नेत्यांवरून आणि आगामी निवडणूकीवरून मनमोकळा गप्पा मारताना शिंदे गट आणि भाजपवर टीका केली. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आयाराम आणि गयाराम यांची भाजपमध्ये सध्या जोरदार प्रवेश होत आहेत. त्यावरून टीका करताना त्यंनी शिंदे गटाबाबत ही मोठा दावा केला. त्यांनी अनेक लोकं राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे तेथेच निष्ठावंतांना आणि पक्ष प्रवेश केलेल्यांना कुठ बसवायचं असा पेच निर्माण झाला आहे. तर नुकताच शिवसेनेतून फुटलेला आणि भाजपच्या सोबत असलेला शिंदे गट त्यांच्यात कधी म्हणता म्हणता भाजपवासी होतील हे सांगता येणार नाही. त्यामुळं भाजपतं जी लोकं गेलीत या सगळ्यांच्या ओझ्याखाली निष्ठावंत मागे ढकलली गेले आहेत, हे पक्क असल्याचं ते म्हणालेत.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम

