AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...

Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…

| Updated on: Aug 24, 2026 | 2:49 PM
Share

अलीकडेट E20 पेट्रोल प्रकरणावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विधानाबाबत अनेक चर्चा केल्या जात होत्या. महत्त्वाचं म्हणजे आता या नंतर मंत्री नितीन गडकरी यांचं एक सुचक विधान चर्चेत आलं आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार या चर्चेंदरम्यानच गडकरींचं हे विधान अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरतंय.

अलीकडेट E20 पेट्रोल प्रकरणावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विधानाबाबत अनेक चर्चा केल्या जात होत्या. महत्त्वाचं म्हणजे आता या नंतर मंत्री नितीन गडकरी यांचं एक सुचक विधान चर्चेत आलं आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार या चर्चेंदरम्यानच गडकरींचं हे विधान अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरतंय.

नितीन गडकरी यांनी अलीकडेच केलेल्या एका महत्त्वपूर्ण विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मी आता जास्त काम करू शकत नाही आणि नवीन पिढीला संधी द्यायला हवी, असे स्पष्ट मत गडकरी यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भविष्यातील राजकारणातील त्यांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गडकरींच्या मते, मी आता जास्त काम करू शकत नाही. ज्यावेळी करू शकलो, तेव्हा केले. पण आता कामातून माझे सक्रिय योगदान कमी झाले आहे. यामागे त्यांनी जीवनातील एका तात्त्विक दृष्टिकोनाचा उल्लेख केला, ज्यात खाली हाथ आया है, खाली हाथ जाना है असे ते म्हणाले. याचा अर्थ, व्यक्ती रिकाम्या हाताने येते आणि रिकाम्या हातानेच जाते, त्यामुळे कोणतेही यश किंवा पद कायमस्वरूपी नसते.

Published on: Aug 24, 2026 02:49 PM

Follow Us