“मुख्यमंत्री मला दिलेला शब्द पाळतील”, मंत्रिमंडळ विस्तारावर प्रताप सरनाईक यांचं सूचक विधान
लवकरच राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. अनेक इच्छुकांनी आपली मंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. अशात, शिवसेनेतील नेते प्रताप सरनाईक यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर सूचक विधान केलं आहे.
मुंबई : लवकरच राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. अनेक इच्छुकांनी आपली मंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. अशात, शिवसेनेतील नेते प्रताप सरनाईक यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर सूचक विधान केलं आहे. “एकनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्याप्रकारे हे सरकार काम करत आहे. 24 तास काम करणारे मुख्यमंत्री, ठाणेकर म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव जगभर गाजतंय. जरी मंत्रिमंडळाचा विस्तार लाभला, तरी इतर मंत्र्यांमुळे राज्याच्या सुरळीत कारभार सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काहीही झालं तरी एखाद्याला दिलेला शब्द पाळण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे मला दिलेला शब्द ते नक्कीच पाळतील”, असं प्रताप सरनाईक म्हणाले. “तसेच लवकरच ते दिलेला शब्द पाळून मंत्रिमंडळ विस्तार करतील याबाबत आमच्या मनात काळजीचे कारण नाही”, असं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलं आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

