Special Report | तणाव हलका करण्यासाठी आठवलेंचे ‘हास्य’तीर
मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे तसेच त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वानखेडे यांनी आपले धर्मांतर लपवून नोकरी बळकावल्याचा आरोप मलिक यांनी केलाय. हे सर्व आरोप वानखेडे तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी फेटाळले आहेत.
मुंबई : मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे तसेच त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वानखेडे यांनी आपले धर्मांतर लपवून नोकरी बळकावल्याचा आरोप मलिक यांनी केलाय. हे सर्व आरोप वानखेडे तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी फेटाळले आहेत. वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन मलिक यांच्यावर टीका केलेली आहे. आज रामदास आठवले यांनी वानखेडे परिवाराला पाठिंबा दर्शविला. तसेच क्रांती रेकडर आणि ज्ञानदेव वानखेडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहिले. मागच्या 4 दिवसांपासून क्रांती रेडकर यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत आहे. मात्र आज आठवलेंच्या कविता आणि विनोदबुद्धीमुळे त्यांनादेखील हसू आवरले नाही.
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...

