Special Report | आधी संजय राऊत,आता आदित्य ठाकरे टार्गेटवर
मुंबई : शिवसंवाद यात्रेतून आदित्य ठाकरेंनी(Aditya Thackeray) बंडखोरांवर निशाणा साधला. शिवसेनेत बंडखोरी केलेल्या नेत्यांवर गद्दार हा टॅग लावला. आणि शिवसेना फोडण्यासाठी भाजपलाच जबाबदार धरलं. त्यानंतर आदित्य ठाकरे हे केंद्र सरकारच्या रडारवर आले आहेत. काऱण आदित्य ठाकरेंनी पर्यावरण खात्यात केलेल्या कामांचं ऑडिट करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतलाय. सध्या केंद्र सरकारकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील कारभाराचं ऑडिट […]
मुंबई : शिवसंवाद यात्रेतून आदित्य ठाकरेंनी(Aditya Thackeray) बंडखोरांवर निशाणा साधला. शिवसेनेत बंडखोरी केलेल्या नेत्यांवर गद्दार हा टॅग लावला. आणि शिवसेना फोडण्यासाठी भाजपलाच जबाबदार धरलं. त्यानंतर आदित्य ठाकरे हे केंद्र सरकारच्या रडारवर आले आहेत. काऱण आदित्य ठाकरेंनी पर्यावरण खात्यात केलेल्या कामांचं ऑडिट करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतलाय. सध्या केंद्र सरकारकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील कारभाराचं ऑडिट सुरु आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, रायगड विभागातील कार्यालयात हे ऑडिट सुरु करण्यात आलंय. यानंतर इतर विभागीय कार्यालयांचंही ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयावर शिवसेना नेत्यांनी आक्षेप घेतलाय. आदित्य ठाकरेंच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत असल्यानंच जाणूनबुजून हा निर्णय घेतल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केलाय.
Published on: Jul 26, 2022 11:52 PM
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
