Sanjay Raut | साकीनाका घटनेचं राजकारण करणं म्हणजे…, संजय राऊत विरोधकांवर संतापले
साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नक्कीच आहे, असा घरचा आहेर संजय राऊत यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. तसेच या घटनेवरून राजकारण न करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नक्कीच आहे, असा घरचा आहेर संजय राऊत यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. तसेच या घटनेवरून राजकारण न करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्य सरकारला आरसा दाखवला आहे. ही अत्यंत दुर्देवी आणि धक्कादायक घटना. मुंबई महिलांसाठी कायम सुरक्षित असल्याची भावना कायम आहे. जगभरातील सुरक्षित शहरात मुंबईचं नाव वरच्या स्थानी आहे. मुंबई हे महिलांसाठी अत्यंत सुरक्षित शहर आहे. ही घटना घडली. त्यावरून गदारोळ सुरू आहे. महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. हा कायदा सुव्यवस्थेचा नक्कीच प्रश्न आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न आहे. पण त्यावरून राजकारण करू नका आणि गोंधळ उडवून सरकारवर चिखलफेक करण्याचं राजकारण करू नये. कारण अशाप्रकारच्या घटना राज्याला मान खाली घालायला लावतात, असं राऊत म्हणाले.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

