AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'आठ दिवसात पंचनामे करा,नाहीतर...', या नेत्यानं दिला राज्य सरकारला इशारा

‘आठ दिवसात पंचनामे करा,नाहीतर…’, या नेत्यानं दिला राज्य सरकारला इशारा

| Updated on: Apr 09, 2023 | 7:55 PM
Share

VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका करत शेतकऱ्यांच्या या नेत्यानं दिला राज्य सरकारला इशारा

बुलढाणा : राज्यात अवकाळी पावसाचं संकट आल्याने राज्यातील शेतकरी पूर्णपणे उद्धस्त झाला असून त्याचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला राज्यातील अवकाळी पाऊस आणि त्यामुळे झालेल्या शेतकऱ्याच्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर इशारा दिला आहे. यावेळी रविकांत तुपकर म्हणाले, ‘राज्य सरकारकडून सप्टेंबर आणि ऑक्टोबरची पूर्ण मदत शेतकऱ्यांना मिळाली नसून आता राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून येत्या आठ दिवसात पंचनामे करा, असे आवाहन करत पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनाला सामोरे जावे लागेल’, असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला आहे. हा इशारा देतांना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर देखील टीका केली आहे. राज्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे संकटात असताना मुख्यमंत्री आपल्या नेत्यांना घेऊन अयोध्येची वारी करायला गेलेत, अयोध्या दौरा महिनाभर उशीराही करता आला असता, राज्यातील बळीराजा सुखी राहिला तर जनता जीवंत राहिल असा हल्लाबोलही त्यांनी चढवला आहे.

Published on: Apr 09, 2023 07:53 PM