महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आज ठाकरे बंधूंकडून शिवतीर्थवर जल्लोष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी राज ठाकरेंनी दिल्ली पोलिसांना टोला लगावला आहे.
मुंबईच्या सर्व पोलिसांचे मी आभार मानतो. त्यांनी उत्तमरित्या सहकार्य केलं आहे. मला असं वाटतं की हाच महाराष्ट्र आणि दिल्लीमधला फरक आहे. महाराष्ट्राचे आमचे पोलीस कसे आहेत आणि दिल्लीचे पोलीस कसे आहेत, हे जगाला कळलं. मी संपूर्ण पोलीस यंत्रणेचे आभार मानतो, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्ली पोलिसांना टोला लगावला आहे. दिल्लीतल्या जंतर मंतर याठिकाणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या लाठीचार्जचा देशभरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच घटनेवरून आता राज ठाकरेंनी शिवतीर्थवरील जल्लोष सभेत दिल्ली पोलिसांना हा टोला लगावला आहे.
Published on: Jul 26, 2026 12:24 PM
Follow Us
Latest Videos
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...

