बळीराजाची अवकाळीपासून कधी होणार सुटका; गडचिरोलीची चिंता वाढवणारी बातमी
जिल्ह्यात अवकाळी पावसाने हाहाकार उडाला आहे. पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळल्याने उन्हाळ्यात पावसाळ्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.
गडचिरोली : राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. अवकाळीसह बऱ्याच जिल्ह्यांना गारपिटीचा तडाखा देखील बसला असून रब्बी हंगामातील शेतपिकांचं प्रचंड नुकसान झालंय. दरम्यान, एकीकडे बळीराजा अवकाळीपासून नेमकी कधी सुटका होईल, याची वाट पाहत असतानाच आता गडचिरोलीची चिंता वाढवणारी बातमी आहे. काही दिवसांपुर्वीच हवामान विभागाने वादळी वारे, पाऊस, गारपीट होण्याची शक्यता वर्तवली होती. त्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटेपासूनच अवकाळीला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसाने हाहाकार उडाला आहे. पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळल्याने उन्हाळ्यात पावसाळ्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. तर या पावसामुळे जिल्ह्यातील शेत शिवारातील धान पिकांचं मोठं नुकसान झाल आहे.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
