Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. त्यामुळे शेतीचं नुकसान झालं आहे.
राज्यात आज अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याने शेतीचं देखील नुकसान झालं आहे. राज्यात काही भागात पुढचे 5 दिवस हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. आज देखील अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. आज दिवसभर ढगाळ वातावरण बनून होते. त्यानंतर दुपारी काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर, कराड, जालना, संभाजीनगर, सातारा, या ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तर अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळीमुळे आंब्याच्या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
Published on: Apr 01, 2025 11:59 PM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

