Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. त्यामुळे शेतीचं नुकसान झालं आहे.
राज्यात आज अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याने शेतीचं देखील नुकसान झालं आहे. राज्यात काही भागात पुढचे 5 दिवस हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. आज देखील अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. आज दिवसभर ढगाळ वातावरण बनून होते. त्यानंतर दुपारी काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर, कराड, जालना, संभाजीनगर, सातारा, या ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तर अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळीमुळे आंब्याच्या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
Published on: Apr 01, 2025 11:59 PM
Follow Us
Latest Videos
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
