Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणुका जाहीर, कोणाच्या गळ्यात पडणार माळ?
Vidhan Parishan Election Declared: विधान परिषदेच्या 5 जागांसाठी येत्या 27 मार्चला निवडणुका होणार आहेत. यात इच्छुक उमेदवारांची नावं समोर आलेली आहेत. अगदी अटीतटीची ही लढत रंगणार आहे.
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. 27 मार्चला या निवडणुका होणार आहेत. महायुतीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला प्रत्येकी 1 जागा येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी, शीतल म्हात्रे यांच्या नावाचही चर्चा सुरू आहे. शिवसेनेतून रवींद्र पाठकसुद्धा इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी आणि आनंद परांजपे यांचं नाव पुढे येत आहे. दरम्यान, भाजपच्या गोट्यात 3 जागा आहेत. अगदी अटीतटीचा हा सामना असणार आहे. त्यामुळे विधान परिषदेची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होईल का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

