Mumbai water : मुंबईतल्या कुर्ला, घाटकोपर, लालबागमध्ये 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार
मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येतंय.
मुंबई : मुंबईतील (Mumbai Water issue) महत्त्वाच्या भागात दोन दिवस पाणीबाणी जाणवण्याची शक्यता आहे. कुर्ला, घाटकोपरसह लालबागमध्ये दोन दिवस पाणीपुरवठ्यावर परिणाम जाणवणार आहे. महापालिकेकडून (BMC) केल्या जाणाऱ्या कामाच्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा प्रभावित होण्याची चिन्ह आहेत. त्या पार्श्वभूमीवर 18 मे पासून 19 मे पर्यंत पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. विद्याविहार इथं सूक्ष्मबोगदा पद्धतीनं जलवाहिन्या वळवण्याचं पहिल्या टप्प्याचं काम सुरु होणार आहे. हे काम 18 आणि 19 मे रोजी हाती घेतलं जाईल. त्यामुळे मुंबईतल्या बहुतांश भागातील पाणी पुरवठ्यावर (Mumbai Water supply News) परिणाम जाणवले. यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येतंय. काही ठिकाणी 18 मे रोजी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद असेल तर काही भागात कमी दाबानं पाणीपुरवठा होईल, असं पालिका प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

