भाजीपाल्याचे दर घसरले, भंडाऱ्यातील शेतकरी आर्थिक संकटात

| Updated on: Mar 02, 2021 | 2:29 PM

भाजीपाला विक्रीतून लागवड खर्चही निघत नसल्यानं शेतकरी संकटात सापडले आहेत. Bhandara farmers vegetable rates

भाजीपाल्याचे दर घसरले, भंडाऱ्यातील शेतकरी आर्थिक संकटात
भंडाऱ्यात भाजीपाल्याचे दर घसरले
Follow us on

भंडारा: जिल्ह्यात सध्या भाजीपाल्याचे भाव बाजारात कमी झाले आहेत.भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारात भाव मिळत नसल्यानं त्यांचं नुकसान होत आहे. वाग्यांना 5 रुपये किलो, टोमॅटो 2 रुपये किलो इतका भाव मिळतोय. भाजीपाला विक्रीतून लागवड खर्चही निघत नसल्यानं शेतकरी संकटात सापडले आहेत.(Bhandara farmers facing problems due to low vegetable rates)

युवा शेतकरी अडचणीत

मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी जयकिशन थोटे हे उच्चशिक्षित शेतकरी आहेत. जयकिशन यांनी ऍग्री मध्ये डिप्लोमा कोर्स केला आहे. नोकरीच्या नादात न पडता त्यांनी शेतामध्येच काहीतरी करावं असा निश्चय करत शेतीमध्ये भाजीपाला पीक लागवड करण्याचा निश्चय केला.. जयकिशन थोटे यांच्याकडे पाच एकर शेती आहे, तीन एकर शेतीमध्ये ते भाजीपाला पीक लागवड करतात.

तीन एकरावर भाजीपाला लागवड

जयकिशन थोटे यांनी 5 एकरपैकी तीन एकरावर वांगे, टोमॅटो, फुलकोबी, पत्ताकोबी, या पिकांची लागवड केली आहे. बाजारात या पिकांना चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, बाजारात वांग्यांना 5 रुपये किलो टोमॅटो 2 रुपये किलो, पत्तागोबी 5 रुपये किलो, फुलगोबी 10 रुपये किलो इतका भाव मिळत असल्याने जयकिशन थोटे यांच्यासह इतर शेतकरी देखील हवालदिल झाले आहेत.

अतिवृष्टी आणि महापुराचा फटका

दररोज डिझेलचे भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांना शेतात नांगरट करणे ही परवडत नाही. तरी देखील शेतीमधून आपला प्रपंच चालविण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. तर, दुसरीकडे औषधांचे खर्चही दुप्पट झाल्याने शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड बसत आहे. कोरोना, महापूर या संकटात सापडलेला शेतकरी कसाबसा सावरत आहे. मोठ्या आशेने भाजीपाला पिकातून आर्थिक परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, बाजारात भाजीपाल्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी कर्ज काढून कशीबशी शेती करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्यांना भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.


संबंधित बातम्या:

टोमॅटो झाला, आता वांग्यालाही कवडीमोल भाव, उद्विग्न शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल

सांगलीच्या पट्ठ्याची कमाल, पाश्चिमात्य देशातील लोकप्रिय ‘लाल भेंडी’ थेट वारणा किनारी

(Bhandara farmers facing problems due to low vegetable rates)