जालना : कृषीपंपाचा (Power Supply) विद्युत पुरवठा खंडीत तर करुच नये शिवाय ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे त्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय अधिवेशनात झाला असला तरी प्रत्यक्षात तसे आदेश स्थानिक पातळीवर मिळालेले नाहीत. त्यामुळे वीज जोडणी तर सोडाच पण तोडणीच सुरु असल्याचे चित्र शेतशिवारात आहे. एकीकडे नांदेड जिल्ह्यात वीजोजडणी केली जात आहे तर दुसरीकडे (Jalna District) जालना, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये आदेश मिळाले नसल्याचे सांगत ही कारवाई सुरु आहे. दोन दिवसांपूर्वीच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तीन महिन्यासाठी वीज तोडणीची मोहिम स्थगित करण्याचे सांगितले होते. मात्र, अनेक जिल्ह्यामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे पाण्याअभावी (Rabi Season) रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान हे सुरुच आहे.
कृषीपंपाच्या वाढत्या थकबाकीमुळे ऐन रब्बी हंगामात विद्युत पुरवठा खंडीत करण्याची मोहिम महावितरणने हाती घेतली होती. यामुळे अडचणीत आलेला शेतकरी थकबाकी अदा करेल असा विश्वास महावितरण कंपनीला होता. पण खरिपात झालेले नुकसान आणि रब्बी हंगामातही निसर्गाचा लहरीपणा कायम असल्याने शेतकरी हे वीजबिल अदाच करु शकले नाहीत. त्यामुळे जालना जिल्ह्यातील तब्बल 134 कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. अद्यापही वीजजोडणी झाली नसल्याने पिकांचे नुकसान हे सुरुच आहे.
मध्यंतरी वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येत होते. पण वीज जोडणीचे आदेश दिल्यानंतरही अधिकाऱ्यांकडून त्याची अंमलबजावणी होताना पाहवयास मिळत नाही. तसेच सलग सुट्यामुळे अधिकारी बांधावर तर सोडाच पण कार्यालयातही नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे रब्बी पिकांवरील संकट अद्यापही टळलेले नाही. मात्र, लेखी आदेश मिळाले नसल्याचेही अधिकारी सांगत आहेत.
रब्बी हंगामातील पिके ही पोषक वातावरणामुळे बहरात आहेत. मात्र, उत्पादन वाढीसाठी जोमात असलेल्या पिकांना आता पाण्याची गरज आहे. असे असताना कृषीपंपाचा विद्युत पुरवठा सुरु झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सोयाबीन, हरभरा, ज्वारी हे अंतिम असून एक पाणी दिले तर उत्पादनात भर पडणार आहे. पण कृषीपंपाचा विद्युत पुरवठाच सुरळीत होत नसल्याने शेतकरी हताश आहे.
Soybean Damage : सोयाबीन पिकलं अन् शेतातच कुजलं, हे सर्व रस्त्याअभावी लातुरात घडलं..!
Grape : द्राक्ष उत्पादकांवर आता दुहेरी संकट, हंगामाच्या अंतिम टप्प्यात सर्वकाही गमावले..!