Kharif Season : पावसाचा धोका टळला अन् किडीचा प्रादुर्भाव वाढला, खरीप पीके धोक्यातच..!

अनेक क्षेत्रात पाणी साचल्याने कापसावर बुरशी जन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत होता त्यात आता कापसावर रस शोषणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या अळीमुळे कापसाची पाने लाल होऊन गळून पडत आहेत. मे महिन्यात लागवड करण्यात आलेला कापूस फुल फुगडी वर आला आहे. मात्र, प्रादुर्भावामुळे कापसाचे फुलं गळून जात आहे.

Kharif Season : पावसाचा धोका टळला अन् किडीचा प्रादुर्भाव वाढला, खरीप पीके धोक्यातच..!
कापसावर रस शोषणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पीक फवारणीची कामे सुरु आहेत.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 2:18 PM

नंदुरबार : सलग दीड महिना (Monsoon Rain) पावसामध्ये सातत्य राहिल्यानंतर आता उघडीप दिली आहे. त्यामुळे रखडलेल्या शेती कामांनी वेग घेतला आहे. खुरपणी, कुळपणी आदी मशागतीची कामे आटोपून पीक वाढीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. असे असतानाच पावसाचा धोका टळला तरी मात्र, (Climate Change) वातावरणातील बदलामुळे कापसावर किडीचा प्रादु्र्भाव हा वाढत आहे. (Kharif Crop) खरिपातील या पिकावर रस शोषणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे एका संकटातून खरीप पिकांना दिलासा मिळाला असला तरी उत्पादनवाढीचा धोका हा कायम आहे. गतवर्षी विक्रमी दर मिळाल्यामुळे यंदा नंदुरबार जिल्ह्यात तब्बल 1 लाख 30 हजार हेक्टरावर कापसाची लागवड झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव उत्पादनाची अपेक्षा होती मात्र, संकटाची मालिका ही सुरुच असल्याने यंदाही काय होते हे पहावे लागणार आहे.

पाणी साचलेल्या क्षेत्रात बुरशीजन्य रोग

1 जुलैपासून राज्यात पाऊस हा सक्रीय झाला होता. तेव्हापासून 15 ऑगस्टपर्यंत पावसामध्ये सातत्य राहिल्याने शेत शिवारात पाणी साचले होते. पीक असलेल्या क्षेत्रात पाणी साचून राहिल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. परिणामी पिकांची वाढ ही खुंटते. निपळीच्या शेतामधून पाणी हे वाहत जाते त्यामुळे या क्षेत्रावरील पिके जोमात असतात. त्यामुळे पावसाचा परिणाम तर पिकांवर होणारच आहे पण आता बदलत्या वातावरणाचा परिणामही जाणवू लागला आहे. सध्या खरिपातील पिके मध्यअवस्थेत आहेत. यातच रोगराईचा प्रादुर्भाव झाला तर उत्पादनाचे काय असा सवाल उपस्थित होत आहे. एकंदरीत हंगामाच्या सुरवातीपासून सुरु असलेली संकटाची मालिका अजूनही कायम आहे.

रस शोषणाऱ्या अळीचा धोका

अनेक क्षेत्रात पाणी साचल्याने कापसावर बुरशी जन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत होता त्यात आता कापसावर रस शोषणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या अळीमुळे कापसाची पाने लाल होऊन गळून पडत आहेत. मे महिन्यात लागवड करण्यात आलेला कापूस फुल फुगडी वर आला आहे. मात्र, प्रादुर्भावामुळे कापसाचे फुलं गळून जात आहे. रस शोषणाऱ्या आळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करत असून फवारणी केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

कृषी विभागाचे मार्गदर्शन ठरेल दिशादर्शक

हंगामाच्या सुरवातीपासून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यातच आता रस शोषणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बळीराजा हतबल झाला आहे. त्यामुळे अशा परस्थितीमध्ये जर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावोगावी किंवा शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन मार्गदर्शन केले तर फायद्याचे ठरणार आहे. शिवाय खरिपातील पिके ही पाच महिन्याची असतात. या दरम्यानच्या काळातच योग्य सल्ला मिळाला तरच फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे अभ्यास करून योग्य ते मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.