AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : फुलकोबी विकून हाती आले अवघे साडे नऊ रुपये, हताश शेतकऱ्यानं साडे नऊ रुपयांचा चेक व्यापाऱ्याला केला परत

मांडवगण फराटा येथील शेतकरी किसन फराटे यांनी मोठ्या आशेने फ्लॉवरची लागवड केली. खते आणि औषधे देत पीकदेखील जोमदार आले होते. तोडणी केल्यानंतर त्यांनी नवी मुंबई येथे विक्रीसाठी फ्लॉवर पाठवले होते.

Pune : फुलकोबी विकून हाती आले अवघे साडे नऊ रुपये, हताश शेतकऱ्यानं साडे नऊ रुपयांचा चेक व्यापाऱ्याला केला परत
साडे नऊ रुपयांच्या चेकसह किसन फराटेImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Aug 21, 2022 | 2:50 PM
Share

पुणे : शेतीमालाला बाजारभाव नसल्याने बळीराजा मेटाकुटीला आला असतानाच शिरूर (Shirur) तालुक्यातील मांडवगण फराटा येथील फुलकोबी (फ्लॉवर) उत्पादक शेतकऱ्याच्या (Farmer) हाती अवघ्या साडे नऊ रुपयांची पट्टी आली आहे. यावर संबंधित शेतकऱ्याने स्वतःच्या खात्याचा साडे नऊ रुपयांचा चेक बाजार समितीमधील व्यापाऱ्याला दिला आहे. यामुळे शेती करायची कशी, असाही प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. शिरूर तालुक्यातील पूर्व भागात तरकारी उत्पादक शेतकरी (Vegetable farmers) मोठ्या प्रमाणावर आहेत शेतात तरकारी पिकवून यावरच शेतकऱ्याचा उदरनिर्वाह होत असतो. या भागात मिरची, भेंडी, वांगी, फ्लॉवर, टोमॅटो, कोबी आदी पिके शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेत असतात. सर्व खर्च वजा जाता केवळ साडे नऊ रुपये आल्याने शेतकऱ्याची मोठी निराशा झाली आहे.

सर्व खर्च शेतकऱ्याच्या माथी

ही तरकारी पिके कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत पुणे, मुंबई, सुरत आदी ठिकाणी रोजच्या रोज पाठवली जातात. याठिकाणी लिलाव पद्धतीने शेतकऱ्याच्या मालाची खरेदी केली जाते. मात्र अतिरिक्त खर्चाचा बोजा, वाहतूक भाडे हे शेतकऱ्याच्याच माथी मारले जात आहे.

cheque

किसन फराटेंना मिळालेला साडे नऊ रुपयांचा चेक

फराटे यांची मोठी निराशा

मांडवगण फराटा येथील शेतकरी किसन फराटे यांनी मोठ्या आशेने फ्लॉवरची लागवड केली. खते आणि औषधे देत पीकदेखील जोमदार आले होते. तोडणी केल्यानंतर त्यांनी नवी मुंबई येथे विक्रीसाठी फ्लॉवर पाठवले होते. यावेळी सर्व खर्च वजा जाता हाती अवघी 9 रुपये 50 पैसे इतकी पट्टी लागली. यामुळे फराटे यांची मोठी निराशा झाली आहे.

‘उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही’

फ्लॉवरला चांगला बाजारभाव मिळेल म्हणून त्यांनी या पिकाची लागवड केली होती. मात्र ही आशा फोल ठरली असून उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. संपूर्ण पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. तसेच संबंधित व्यापाऱ्यांकडून फसवणूक होत असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. शेतमालात फसवणूक होत राहिली तर भविष्यात शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी हताश प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.