Pune : निमगाव दावडीत कालवा फुटला, सर्वत्र पाणीच-पाणी, वाहतूकही विस्कळीत..!

कालवा फुटल्याने केवळ शेती पिकांचेच नुकसान असे नाही तर साठलेले पाणी येथील दावडी-राजगुरुनगर मार्गावरही आले होते. पाण्याचा प्रवाह अधिकचा असल्याने या मार्गावरील वाहतूक ही काळ बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोयही झाली होती. अचानक कालव्यातील पाणी लगतच्या परिसरात आणि शेत शिवरात झाल्याने येथील चित्र हे वेगळेच होते.

Pune : निमगाव दावडीत कालवा फुटला, सर्वत्र पाणीच-पाणी, वाहतूकही विस्कळीत..!
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 5:03 PM

पुणे : पुणेच नाहीतर राज्यात गेल्या काही दिवसांपासून (Rain) पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे (Kharif Season) खरीप हंगामात सध्या शेती मशागतीची कामे सुरु आहेत. असे असले खरिपावरील संकट काही दूर झाले नाही. कोणत्या ना कारणाने पिकांचे नुकसान हे ठरलेलेच आहे. खेड तालुक्यातील निमगाव दावडी येथे चासकमान (Left Canal) धरणाचा डावा कालवा फुटला आहे. त्यामुळे या परिसरात पाणीच-पाणी अशी स्थिती निर्माण झाली असून आता या कालव्यात पाणीसाठा राहतो की नाही अशी आवस्था आहे. कालव्यातील पाणी रस्त्यावर आणि शेत जमिनीत घुसल्याने खरीप हंगामातील पिकांवर पुन्हा संकट ओढावले आहे. अचानक ही घटना घडल्याने पाण्यावर नियंत्रण मिळवणेही मुश्किल झाले आहे. केवळ पाण्याचाच अपव्ययच नाहीतर या भागातील वाहतूक व्यवस्थाही बंद ठेवण्यात आली होती.

शेतीसाठी महत्वाचा कालवा

खेड तालुक्यातील निमगाव दावडी येथील हा चासमास धरणावरील डावा कालवा हा शेती सिंचनाच्या दृष्टीकोनातून महत्वाचा आहे. सध्या सर्वत्रच मुबलक प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे सावट नसले तरी उन्हाळ्यात याच कालव्यातील पाण्याचा आधार खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना असतो. मात्र, आता अचानक कालवाच फुटल्याने पुन्हा कालव्यात पाणीसाठा होईल का नाही याबाबत शंका आहे. याच कालव्याचा आधार शेतीसह लगतच्या गावातील ग्रामस्थांना होता. भविष्यातील रब्बी पिकांचे काय होणार याची चिंता या परिसरातील शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

वाहतूकही ठप्प

कालवा फुटल्याने केवळ शेती पिकांचेच नुकसान असे नाही तर साठलेले पाणी येथील दावडी-राजगुरुनगर मार्गावरही आले होते. पाण्याचा प्रवाह अधिकचा असल्याने या मार्गावरील वाहतूक ही काळ बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोयही झाली होती. अचानक कालव्यातील पाणी लगतच्या परिसरात आणि शेत शिवरात झाल्याने येथील चित्र हे वेगळेच होते.

हे सुद्धा वाचा

शेतशिवारात पाणी साचले

कालव्यातील पाण्याचा उपयोग हा शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांसाठी होत असत. खरिपातील पिके ही पावसाच्या पाण्यावर आणि रब्बीतील पिकेही कालव्यातील पाण्यावर असे गणित या भागातील शेतकऱ्यांचे होते. पण आता कालवा अचानक फुटल्याने खरीप हंगामातील पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण भविष्यातील पिकांना पाणी द्यायचे कसे असा सवाल आहे. दावडी येथील शेत शिवारात पाणीच पाणी अशी स्थिती आहे.

Non Stop LIVE Update
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.