AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : निमगाव दावडीत कालवा फुटला, सर्वत्र पाणीच-पाणी, वाहतूकही विस्कळीत..!

कालवा फुटल्याने केवळ शेती पिकांचेच नुकसान असे नाही तर साठलेले पाणी येथील दावडी-राजगुरुनगर मार्गावरही आले होते. पाण्याचा प्रवाह अधिकचा असल्याने या मार्गावरील वाहतूक ही काळ बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोयही झाली होती. अचानक कालव्यातील पाणी लगतच्या परिसरात आणि शेत शिवरात झाल्याने येथील चित्र हे वेगळेच होते.

Pune : निमगाव दावडीत कालवा फुटला, सर्वत्र पाणीच-पाणी, वाहतूकही विस्कळीत..!
सांकेतिक छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Aug 21, 2022 | 5:03 PM
Share

पुणे : पुणेच नाहीतर राज्यात गेल्या काही दिवसांपासून (Rain) पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे (Kharif Season) खरीप हंगामात सध्या शेती मशागतीची कामे सुरु आहेत. असे असले खरिपावरील संकट काही दूर झाले नाही. कोणत्या ना कारणाने पिकांचे नुकसान हे ठरलेलेच आहे. खेड तालुक्यातील निमगाव दावडी येथे चासकमान (Left Canal) धरणाचा डावा कालवा फुटला आहे. त्यामुळे या परिसरात पाणीच-पाणी अशी स्थिती निर्माण झाली असून आता या कालव्यात पाणीसाठा राहतो की नाही अशी आवस्था आहे. कालव्यातील पाणी रस्त्यावर आणि शेत जमिनीत घुसल्याने खरीप हंगामातील पिकांवर पुन्हा संकट ओढावले आहे. अचानक ही घटना घडल्याने पाण्यावर नियंत्रण मिळवणेही मुश्किल झाले आहे. केवळ पाण्याचाच अपव्ययच नाहीतर या भागातील वाहतूक व्यवस्थाही बंद ठेवण्यात आली होती.

शेतीसाठी महत्वाचा कालवा

खेड तालुक्यातील निमगाव दावडी येथील हा चासमास धरणावरील डावा कालवा हा शेती सिंचनाच्या दृष्टीकोनातून महत्वाचा आहे. सध्या सर्वत्रच मुबलक प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे सावट नसले तरी उन्हाळ्यात याच कालव्यातील पाण्याचा आधार खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना असतो. मात्र, आता अचानक कालवाच फुटल्याने पुन्हा कालव्यात पाणीसाठा होईल का नाही याबाबत शंका आहे. याच कालव्याचा आधार शेतीसह लगतच्या गावातील ग्रामस्थांना होता. भविष्यातील रब्बी पिकांचे काय होणार याची चिंता या परिसरातील शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

वाहतूकही ठप्प

कालवा फुटल्याने केवळ शेती पिकांचेच नुकसान असे नाही तर साठलेले पाणी येथील दावडी-राजगुरुनगर मार्गावरही आले होते. पाण्याचा प्रवाह अधिकचा असल्याने या मार्गावरील वाहतूक ही काळ बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोयही झाली होती. अचानक कालव्यातील पाणी लगतच्या परिसरात आणि शेत शिवरात झाल्याने येथील चित्र हे वेगळेच होते.

शेतशिवारात पाणी साचले

कालव्यातील पाण्याचा उपयोग हा शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांसाठी होत असत. खरिपातील पिके ही पावसाच्या पाण्यावर आणि रब्बीतील पिकेही कालव्यातील पाण्यावर असे गणित या भागातील शेतकऱ्यांचे होते. पण आता कालवा अचानक फुटल्याने खरीप हंगामातील पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण भविष्यातील पिकांना पाणी द्यायचे कसे असा सवाल आहे. दावडी येथील शेत शिवारात पाणीच पाणी अशी स्थिती आहे.

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा