AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आर्थिक आणीबाणी आली तर असे रहा सावध

वेळ कधी कोणावर सांगून येत नाही. पैशाची गरज देखील कधीही भासू शकते. परंतु एकदम गरज असताना पैसे नसतील तर काय करावे हा प्रश्न पडतोच. त्यासाठी कोणते मार्ग आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जरूर पहा

आर्थिक आणीबाणी आली तर असे रहा सावध
| Updated on: Jan 12, 2023 | 5:48 PM
Share

मुंबई : अचानक पैशाची गरज कोणालाही भासू शकते . अचानक आर्थिक नुकसान झाल्यास किंवा खर्चात वाढ झाल्यास फायनान्शियल रिस्क किंवा आर्थिक जोखीम म्हणता येईल. कधी गुंतवणुकीत नुकसान तर कधी पगारात घट होते परंतु खर्च काही कमी होत नाहीत. कोणतीही दुर्घटना , आजार अशा कोणत्याही प्रकारची जोखीम आली आणि बचत नसेल तर तणाव वाढतो.

कार अपघात झाला तर आपले रक्षण व्हावे यासाठी सीटबेल्ट लावतो. अशाप्रकारे आर्थिक जोखीमी अचानक आल्यास इमर्जन्सी फंड या सिटबेल्टचे काम करतात.

कमावण्यास सुरू केल्यानंतर सर्वात आधी पुढील 6 महिन्याच्या खर्चासाठी वेगळे पैसे काढून ठेऊन इमर्जन्सी फंड तयार करावा.

जर तुमचा पगार 55 हजार रुपये असेल तर त्यातून घरभाडे, कर्जाचा EMI , रेशन, मुलांच्या शिक्षणाची फी, कामवालीचा पगार , फोन बिल , सोसायटीचा मेंटेनंस हा सर्व खर्च 35 हजार रुपयांपर्यंत होत असेल, मनोरंजन किंवा बाहेर कधी खायचे झाल्यास, मुव्हीला जायचे असल्यास तर सर्व मिळून 5 हजार . हे सर्व खर्च होऊन तुमच्या हातात बचत म्हणून 10 हजार रूपये शिल्लक राहतात.

जर 40 हजार रुपये महिन्याचा खर्च झाल्यास 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड म्हणून तुम्हाला 2 लाख 40 हजार रुपये जमा करावे लागतील. 10 हजार महिना बचत होत असेल तर टार्गेट पूर्ण होण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी लागेल.

यामध्ये देखील कोणतीही गुंतवणूक किंवा मोठा खर्च नाही केला तर.

इमर्जन्सी फंडाची रक्कम गुंतवण्याची चूक न करता जिथून लवकर काढता येतील अशा ठिकाणी ठेवा. यासाठी वेगळ्या बँकेत तुम्ही अकाऊंट सुरू करू शकता. फ्लेक्सीबल FD ज्यामध्ये पैसे कधीही ट्रान्सफर करू शकता, किंवा म्युच्युअल फंडबद्दल कल्पना असेल तर शॉर्ट टर्म डेट स्कीम हा पर्याय देखील आहे.

त्यामुळे कोणतीही आर्थिक आणीबाणी आल्यास इमर्जन्सी फंड असणे किती गरजेचे आहे . तर आता वेळ न घालवता लगेच इमर्जन्सी फंडसाठी काम सुरू करा.

Follow Us
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....