मोठी बातमी ! गाड्यांना अपघातापासून वाचवण्यासाठी बनवले नवे कवच, जाणून घ्या

उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कॅप्टन शशी किरण यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय रेल्वेवर लाल स्थितीत (म्हणजे स्टॉप सिग्नल) सिग्नल ओलांडू नये, दिलेल्या निर्धारित गतीपेक्षा जास्त वेगाने ट्रेन चालवू नये आणि अपघात टाळण्यासाठी बचाव प्रणाली TCAS विकसित करण्यात आलीय, ज्याला 'कवच' असे नाव देण्यात आले.

| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Oct 08, 2021 | 3:29 PM
1 / 5
रेल्वेमध्ये सुरक्षेला सर्वोच्च महत्त्व आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे वचनबद्ध आहे. सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी भारतीय रेल्वेने एक पूर्णपणे स्वदेशी प्रणाली TCAS (ट्रेन टक्कर टाळण्याची प्रणाली) विकसित केलीय.

रेल्वेमध्ये सुरक्षेला सर्वोच्च महत्त्व आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे वचनबद्ध आहे. सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी भारतीय रेल्वेने एक पूर्णपणे स्वदेशी प्रणाली TCAS (ट्रेन टक्कर टाळण्याची प्रणाली) विकसित केलीय.

2 / 5

उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कॅप्टन शशी किरण यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय रेल्वेवर लाल स्थितीत (म्हणजे स्टॉप सिग्नल) सिग्नल ओलांडू नये, दिलेल्या निर्धारित गतीपेक्षा जास्त वेगाने ट्रेन चालवू नये आणि अपघात टाळण्यासाठी बचाव प्रणाली TCAS विकसित करण्यात आलीय, ज्याला 'कवच' असे नाव देण्यात आले.

3 / 5

4 / 5

यासह सिग्नलचे स्थान आणि येणाऱ्या सिग्नलचे अंतर देखील या प्रणालीद्वारे ओळखले जाते, ज्यामुळे लोको पायलट ट्रेन अधिक प्रभावीपणे चालवू शकतो. ही प्रणाली लोको पायलटला सक्रिय करते आणि कोणत्याही मार्गावर अडथळा दिसताच सतर्क करते, जसे की दुसऱ्या ट्रेनचे आगमन किंवा उभे राहणे आणि विशिष्ट कालावधीत ट्रेनवर ब्रेक आपोआप लागू होते, जेणेकरून कोणतीही अनुचित घटना टाळता येईल.

5 / 5

उत्तर पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय शर्मा यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि पुढाकाराने 436.22 कोटी रुपये खर्च करून उत्तर पश्चिम रेल्वेवर 1586 किलोमीटरच्या रेल्वे मार्गांवर ही प्रणाली उभारण्यास तत्वतः मान्यता प्राप्त झाली. लवकरच पूर्ण होणार आहे. उत्तर पश्चिम रेल्वे पण ही 'कवच' प्रणाली जयपूर, जयपूर-सवाई माधोपूर, उदयपूर-चित्तौड़गढ, फुलेरा-जोधपूर-मारवाड आणि लुनी-भिल्डी मार्गे रेवाडी-पालनपूरच्या 1586 किमी रेल्वे विभागात मंजूर झाली. ही प्रणाली सुरू केल्याने एकीकडे गाड्यांच्या सुरक्षित संचालनामध्ये वाढ होईल, तर दुसरीकडे स्थानकाच्या अचूक माहितीमुळे ट्रेनचा सरासरी वेगही वाढेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us