AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! विमान कंपन्यांच्या मनमानी कारभाराला मोठा ब्रेक, सरकारने दिले निर्देश, आता..

देशातील विमानसेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे बघायला मिळत आहे. इंडिगोची सेवा पूर्णपणे विस्कळीत आहे. याचा फटका गेल्या चार दिवसांपासून प्रवाशांना बसतोय. आजही इंडिगोची विमानसेवा ठप्प आहे. त्यामध्येच आता सरकारने मोठा निर्णय घेतला.

मोठी बातमी! विमान कंपन्यांच्या मनमानी कारभाराला मोठा ब्रेक, सरकारने दिले निर्देश, आता..
Airline
| Updated on: Dec 06, 2025 | 1:51 PM
Share

इंडिगोकडून मागील चार दिवसांपासून विमान उड्डाणे रद्द केली जात आहेत. आज पाचवा दिवस असून अजूनही इंडिगोची सेवा सुरळीत झाली नाही. अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्याने मोठा हा:हाकार देशात माजला. विमानतळावर मोठी गर्दी बघायला मिळत आहे. प्रवाशांचा संताप सुरू असून दुसऱ्या विमान कंपन्यांनी तिकिट दरांमध्ये मोठी वाढ केली. हेच नाही तर देशातंर्गत प्रवास करण्यासाठी आता लाखो रूपये मोजावी लागत आहेत. दुसऱ्या विमान कंपन्यांनी वाढवलेल्या तिकीट दरामुळे प्रवासी अडचणीत सापडले आहेत. इंडिगोवर कारवाई सरकारने करावी, अशी मागणी केली जात आहे. यादरम्यानच आता सरकारने अत्यंत मोठा आदेश विमान कंपन्यांना दिला आहे.

परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, गृहमंत्री अमित शहा यांना हस्तक्षेप करून नागरी उड्डाण मंत्रालयाशी बोलावे लागले. त्यामध्येच सरकारने दिलेल्या आदेशानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. केंद्र सरकारने हस्तक्षेप करून विमान कंपन्यांची मनमानी थांबवण्यासाठी कठोर कारवाई केली आहे. विमान भाडेवाढीवर स्थगिती देण्यात आली. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सर्व विमान कंपन्यांना निर्देश जारी केले आहेत.

सरकारच्या या निर्देशानंतर विमान कंपन्यांची मनमानी थांबणार असल्याचे स्पष्ट आहे. सरकारने सांगितले आहे, भाडे निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त नसावे. इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यानंतर दुसऱ्या विमान कंपन्यांनी संधीचा चुकीचा फायदा घेतला आणि स्वत: वाटतील तशी भाडेवाढ केली. एका तिकिटावर त्यांनी तब्बल पंधरा ते वीस हजार वाढ केली. साधारणपणे अगोदर मिळणारे 10 हजाराचे तिकिट आता 50 हजारांना विकले जातंय.

प्रवाशी इंडिगोच्या विस्कळीत विमान सेवेमुळे अनेक ठिकाणी अडकले आहेत. महागडी तिकिटे खरेदी करूनही प्रवासी आपल्या इच्छित स्थळी पोहोचत आहेत. मात्र, वाढलेल्या तिकिट दरामुळे लोकांमध्ये मोठे संतापाचे वातावरण बघायला मिळाले. शेवटी सरकारने यामध्ये मध्यस्थी करत विमान कंपन्यांना मोठे निर्देश दिले असून कारवाई करण्याचेही संकेत दिली आहेत. यामुळे विमान कंपन्यांच्या मनमानी कारभाराला कुठेतरी ब्रेक लागणार आहे.

Follow Us
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.