AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ESIC Covid Benefits: लाखो कामगारांसाठी चांगली बातमी, कोरोनानं मृत्यू झाल्यास आई, पत्नी, मुलगा, मुलगी यांना मिळणार पेन्शन

जर एखाद्या कामगारांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आणि तो ईएसआयसीच्या कक्षेत आला तर त्याला ईएसआयसी पेन्शनचा लाभ मिळेल, असंही कामगार मंत्रालयाच्या वतीने सांगितले गेले.

ESIC Covid Benefits: लाखो कामगारांसाठी चांगली बातमी, कोरोनानं मृत्यू झाल्यास आई, पत्नी, मुलगा, मुलगी यांना मिळणार पेन्शन
ESIC Pension scheme
| Edited By: | Updated on: Jul 22, 2021 | 8:28 PM
Share

नवी दिल्लीः ESIC Pension Scheme: कोरोना संकटाच्या वेळी सरकारने अनेक प्रकारच्या दिलासादायक घोषणा केल्यात. अलीकडेच सरकारने ईएसआयसी पेन्शनबाबतचे नियम बदलले होते. जर एखाद्या कामगाराचा मृत्यू कोरोनामुळे झाला आणि तो ईएसआयसीच्या कक्षेत आला तर त्याला ईएसआयसी पेन्शनचा लाभ मिळेल, असंही कामगार मंत्रालयाच्या वतीने सांगितले गेले, यासह काही अटी देखील समाविष्ट केल्यात. या नियमांबद्दल जाणून घेऊयात.

नवीन नियम 24 मार्च 2020 पासून लागू करण्यात आला

कोरोना संकटाच्या वेळी जे लोक ईएसआयसी योजनेंतर्गत जोडले गेले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याच्या उद्देशाने हा त्वरित बदल नियमात करण्यात आलाय. नवीन नियम 24 मार्च 2020 पासून लागू करण्यात आला आणि पुढील दोन वर्षांसाठी म्हणजे 24 मार्च 2022 पर्यंत लागू असेल. ईएसआयसी पेन्शनचा लाभ घेण्यापूर्वी आम्हाला आवश्यक अटींबद्दल माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

विमाधारकाच्या मृत्यूचे एक वर्ष आधीचे योगदान कमीत कमी 78 दिवस असावे

प्रथम पात्रतेच्या अटीनुसार, ईएसआयसी पोर्टलवर विमा काढलेल्या व्यक्तीची (आयपी) नोंदणी कोविड शोधण्यापूर्वी कमीत कमी तीन महिने आधी झाली पाहिजे. दुसरी अट अशी आहे की, विमाधारकाच्या मृत्यूचे एक वर्ष आधीचे योगदान कमीत कमी 78 दिवस असले पाहिजे. जर दोन्ही अटी पूर्ण झाल्या तर पीडित कुटुंबाला पेन्शनचा लाभ मिळेल.

तुम्हाला किती पेन्शन मिळेल?

ESIC Pension योजनेंतर्गत रोजंदारीच्या सरासरी 90 टक्के वेतन पेन्शन म्हणून मिळणार आहे. जर एखाद्या कामगारांचे सरासरी वेतन 20 हजार रुपये असेल तर त्याच्या कुटुंबास पेन्शन व सहाय्य म्हणून दरमहा एकूण 18000 रुपये मिळतील. सरासरी वेतन काढण्याचा नियमही देण्यात आलाय. प्रत्येक आर्थिक वर्षात दोन योगदान कालावधी असतात. प्रथम योगदानाचा कालावधी एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत आहे. ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत योगदानाचा दुसरा कालावधी आहे. एप्रिल ते सप्टेंबरच्या योगदानाच्या कालावधीसाठी येत्या वर्षाच्या जानेवारी ते जून या कालावधीस लाभाचा कालावधी म्हणतात. त्याचप्रमाणे ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत त्या वर्षाच्या जुलै ते डिसेंबर या कालावधीला लाभ कालावधी म्हणतात. आयपीसाठी शेवटच्या योगदान कालावधीचा सरासरी पगार पेन्शनचा आधार असेल.

पेन्शनचा लाभ कोणाला मिळतो?

जर विमाधारक व्यक्ती विवाहित असेल तर त्याची पेन्शन पत्नी, आई, मुलगा आणि मुलगीमध्ये विभागली जाईल. आयुष्यभरासाठी पेन्शन रेटपैकी 60 टक्के पत्नीला मिळतील. आईला संपूर्ण आयुष्यभर पेन्शन रेटचा 40 टक्के हिस्सा मिळेल. 25 वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलाला पेन्शन दराच्या 40 टक्के रक्कम मिळेल आणि मुलीचे लग्न होईपर्यंत पेन्शनचा लाभ मिळेल. निवृत्तीवेतनाचा दर सरासरी वेतनाच्या 90 टक्के आहे. लक्षात ठेवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे पेन्शनच्या एकूण रकमेपेक्षा एकूण पेन्शनची रक्कम जास्त असू शकत नाही. जर ती जास्त असल्यास त्याची कपात केली जाईल.

संबंधित बातम्या

देशाचा पहिला निफ्टी आधारित वित्तीय सेवा निर्देशांक फंड लाँच, जाणून घ्या सर्व काही

भारतीय उद्योजक चीनला एक लाख कोटींचा धक्का देणार; चिनी उत्पादनांवर बहिष्कार मोहीम

ESIC Covid Benefits: Good news for millions of workers, mother, wife, son, daughter to get pension in case of death of Corona

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.