ना परीक्षा ना मुलाखतीचे टेन्शन, रेल्वेच्या ‘या’ विभागात बंपर भरतीला सुरूवात, थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी

रेल्वेमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे दहावी आणि बारावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी आपले अर्ज हे दाखल करावेत. रेल्वे विभागाने या भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिसूचना ही जाहिर केली. या भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व माहिती जाणून घ्या.

ना परीक्षा ना मुलाखतीचे टेन्शन, रेल्वेच्या 'या' विभागात बंपर भरतीला सुरूवात, थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी
Follow us
| Updated on: Dec 11, 2023 | 1:06 PM

मुंबई : दहावी आणि बारावी पास असलेल्या तरूणांसाठी मोठी संधी आहे. थेट रेल्वेमध्ये नोकरी करण्याची ही संधी आहे. विशेष म्हणजे रेल्वे विभागाकडून या भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिसूचना ही जाहीर करण्यात आलीये. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी आपले अर्ज हे दाखल करावेत. ही बंपर भरती प्रक्रिया उत्तर रेल्वेकडून राबवली जातंय. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी सुरू आहे. अजिबातच वेळ वाया न घालता उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी आपले अर्ज हे दाखल करावेत. ही मोठी संधीच दहावी आणि बारावी पास असणाऱ्यांसाठी नक्कीच आहे.

विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. इतकेच नाही तर कोणत्याही प्रकारची परीक्षा किंवा मुलाखत उमेदवारांची घेतली जाणार नसल्याचे सांगितले जातंय. 3000 पेक्षाही अधिक जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अर्ज हा आॅनलाईन पद्धतीने दाखल करावा लागणार आहे. rrcnr.org या साईटवर भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व माहिती मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 100 रूपये फिस लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची कोणत्याही प्रकारची परीक्षा किंवा मुलाखत ही घेतली जाणार नाहीये. उमेदवाराची निवड ही थेट मार्कांनुसार केली जाणार आहे. यामुळे इच्छुकांनी अधिक वेळ वाया न घालता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करावे. ही मोठी संधीच आहे.

अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना सर्वात अगोदर rrcnr.org या साईटवर जावे लागेल. यानंतर होमपेजला जाऊन ऑनलाइन अॅप्लिकेशनवर क्लिक करा. त्यानंतर उमेदवाराने आपले रजिस्ट्रेशन हे करून घ्यावे. लॉगिनवर अॅप्लिकेशन अर्ज भरावा. त्यानंतर उमेदवाराला फिस भरावी लागेल. त्यानंतर आपला अर्ज दाखल करून घ्या. भरलेला अर्ज देखील डाउनलोड करावा लागेल.

विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया 3,093 पदांसाठी राबवली जातंय. उमेदवाराकडे मान्यता प्राप्त बोर्डाचे दहावी पास असण्याचे प्रमाणपत्र आणि तसेच आयटीआय प्रमाणपत्र असणेही आवश्यक आहे. ही मोठी बंपर भरती राबवली जातंय. तसेच या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील ठेवण्यात आलीये. 18 ते 24 वय असलेले उमेदवार हा भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करू शकतात.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.