देणेकरी जास्तीचे पैसे मागत होते, व्यापाऱ्याने नकार दिला, मग गुंडांनी थेट व्यापाऱ्यालाच पळवून नेला!

| Updated on: Mar 16, 2023 | 11:40 AM

व्यापाऱ्याने एका व्यक्तीकडून उसने पैसे घेतले होते. हे पैसे त्याने परतही केले. मात्र त्यानंतरही देणेकरी त्याच्याकडे आणखी पैसे मागत होता. मात्र व्यापाऱ्याने पैसे देण्यास नकार दिला.

देणेकरी जास्तीचे पैसे मागत होते, व्यापाऱ्याने नकार दिला, मग गुंडांनी थेट व्यापाऱ्यालाच पळवून नेला!
पैशाच्या वादातून व्यापाऱ्याचे अपहरण
Image Credit source: Google
Follow us on

पिंपरी चिंचवड / रणजित जाधव : पैशाच्या वादातून एका व्यापाऱ्याचे अपहरण केल्याची घटना चिंचवड शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. राजाराम डगलारामजी सिरवी असे अपहरण करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. आरोपींविरोधात कलम 363, 364 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. हरिश चौधरी, राहुल उणेचा, बाळा वाघेरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

उसने पैसे करुनही आणखी मागत होता

राजाराम सिरवी यांचे लक्ष्मीनगर मारुंजी परिसरात हार्डवेअरचे दुकान आहे. सिरवी यांनी वाल्हेकरवाडी येथील हरिश चौधरी यांच्यासोबत पैशाचा व्यवहार झाला होता. मात्र ते पैसे व्यापाऱ्याने परत केले तरी चौधरी आणखी पैसे मागत होता. आणखी पैसे देण्यास व्यापाऱ्याने नकार दिल्याने चौधरी आणि अन्य तिघा आरोपींनी त्यांचे अपहरण केले.

व्यापाऱ्याने कशीबशी सुटका करुन पोलीस ठाणे गाठले

पीडित सिरवी यांनी पैसे देण्याचे कबुल करत कशीबशी स्वतःची सुटका करुन घेतली. यानंतर त्यांनी थेट चिंचवड पोलीस ठाणे गाठत घडल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पीडिताच्या फिर्यादीवरुन चौघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. यापैकी तिघा आरोपींना अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा