नवी दिल्ली : गुजरातमधील (Gujarat) अरवली (Aravali) जिल्ह्यात अंबाजीकडे (Ambaji) जाणाऱ्या लोकांना कारने चिरडल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत एकूण 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यापैकी 7 जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर लगेचच स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हा अपघात इतका भयानक होता की, सात जणांचा जाणीचं मृत्यू झाला आहे. त्यामुळे घटनास्थळी नागरिकांची अधिक गर्दी झाली होती.
या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारण अपघातामध्ये सात लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ओळख पटवण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. एका कारने पायी चालत असलेल्या सात भक्तांना चिरडले आहे. अंबाजी मातेच्या दर्शनासाठी सगळे भक्त पायी चालत निघाले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली.
गुजरातमधील अरवली येथील बनासकांठा येथे अंबाजी मातेच्या दर्शनासाठी पायी चालत निघालेल्या भक्तांना भरधाव कारने चिरडले. कारच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले बहुतांश पंचमहालचे रहिवासी असल्याची चर्चा आहे. हे सर्व लोक प्रसिद्ध शक्तीपीठ अंबाजी माता मंदिरात दर्शनासाठी पायी जात होते. यादरम्यान एका कारने भाविकांना चिरडले. या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.