AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरा-बायको रात्री खोलीत झोपायला गेले, सकाळी पाहिले तर धक्काच बसला; ‘त्या’ खोलीत असं काय घडलं?

अवघ्या काही महिन्यांपूर्वी लग्न झालेलं जोडपं रात्री झोपायला त्यांच्या खोलीत गेलं. पण सकाळी बऱ्याच उशीरापर्यंत बाहेरच आले नाही. म्हणून कुटुंबियांनी जोर लावून दरवाजा उघडला असता जे दृश्य दिसलं ते पाहून...

नवरा-बायको रात्री खोलीत झोपायला गेले, सकाळी पाहिले तर धक्काच बसला; 'त्या' खोलीत असं काय घडलं?
गोंदियात जुन्या वादातून तरुणाला संपवले
| Updated on: May 08, 2023 | 3:17 PM
Share

हजारीबाग ( झारखंड) : हजारीबागच्या बरकठ्ठा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या वरवा गावात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिथे नवविवाहित जोडप्याचा मृतदेह (body found in room) त्यांच्या घरातील एका खोलीत आढळून आला आहे. महिलेचा मृतदेह बेडवर तर पतीने गळ्याला फास लावून घेतल्याचे  (husband and wife killed themselves) आढळून आले. नेहमीप्रमाणे रात्रीचे जेवण करून दोघेही खोलीत झोपायला गेले. मात्र सकाळी खोलीत दोघांचाही मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरवा गावातील रहिवासी हिरामण यादव यांचा मुलगा 25 वर्षीय राजकुमार याचा विवाह 22 वर्षीय पूजा देवी हिच्यासोबत 22 फेब्रुवारी 2023 रोजी झाला होता. राजकुमार यादव हा मुंबईत कामाला होता आणि आठ दिवसांपूर्वी घरी आला होता. तीन दिवसांपूर्वी मुलीचा मेव्हणा इथे आला होता. तेव्हापासून या दाम्पत्यामध्ये वाद सुरू होता, असे समजते.

काल रात्री जेवण करून दोघेही खोलीत झोपायला गेले. मात्र सकाळी उशिरापर्यंत ते खोलीबाहेर न पडल्याने नातेवाइकांनी दरवाजा ठोठावण्यास सुरुवात केली. पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून एखा व्यक्तीने खिडकीतनू डोकावले असता, राजकुमारने गळफास लावून घेतल्याचे आढळले तर पूजाचा मृतदेह बेडवर पडलेला होता. त्यानंतर नातेवाईकांनी शेजाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर इतर लोकांच्या मदतीने खोलीचा दरवाजा तोडून सर्वांनी आत प्रवेश केला.

नातेवाइकांनी पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. बरकठ्ठा पोलिस स्टेशनचे प्रभारी विक्रम कुमार यांनी सांगितले की, या जोडप्याच्या मृत्यूची नोंद झाली आहे. घटनास्थळी पोहोचल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस कुटुंबीयांची चौकशी करून विविध पैलूंचा तपास करत आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.