AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर सातव्या दिवशी अचानक नवरी गायब झाली, कुटुंबीयांनी शोध घेतला असता जे समोर आलं ते भयंकर !

एका तरुणाचे थाटामाटात लग्न झाले. मनाप्रमाणे जोडीदार मिळाल्याने तरुण खूप खूश होता. मात्र त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. लग्नानंतर एका आठवड्यातच जे घडले ते फार धक्कादायक होते.

लग्नानंतर सातव्या दिवशी अचानक नवरी गायब झाली, कुटुंबीयांनी शोध घेतला असता जे समोर आलं ते भयंकर !
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरीचे पलायनImage Credit source: socialmedia
| Updated on: Mar 23, 2023 | 5:25 PM
Share

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप महत्वाचा क्षण असतो. प्रत्येक जोडप्याच्या मनात सुखी संसाराचे चित्र असते. पण हे स्वप्न भंग झाले तर काय होईल?. अशीच एक घटना इंदूरमध्ये उघडकीस आली आहे. एका तरुणाचा थाटामाटात विवाह पार पडला. मनाप्रमाणे जोडीदार मिळाल्याने तरुण खूप खूश होता. आपल्या जोडीदारासोबत भविष्याची स्वप्ने रंगवत होता. मात्र त्याचा हा आनंद अधिक काळ टिकला नाही. लग्नानंतरच सात दिवसातच जे घडले त्यानंतर नवरदेवासह त्याच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्काच बसला.

लग्नानंतर सात दिवसांनी नवरी गायब झाली

लग्नानंतर हनिमूनच्या दिवशी वधूने आपल्याला मासिक पाळी आल्याचे सांगत पतीला जवळ येण्यास रोखले. मग काही ना काही कारण सांगून पत्नी पतीला स्वतःपासून दूर ठेवत होती. यानंतर लग्नानंतर सात दिवसांनी अचानक नवरी घरुन गायब झाली. कुटुंबीयांनी आणि पतीने सगळीकडे तिचा शोध सुरु केला. यानंतर घरच्यांनी घरातील तिजोरी पाहिली तर सोन्याचे-चांदीचे दागिने आणि 3 लाख रुपये रोकड पण गायब होते.

लग्न जुळवणाऱ्या एजंटच्या घरी पोहचताच सर्वच हैराण झाले

यानंतर सर्वजण लग्न जुळवून देणाऱ्या एजंटकडे पोहचले. तिथे पोहचताच समोर जे दृश्य दिसले त्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. नववधू लग्न जुळवणाऱ्या एजंटसोबत नको त्या अवस्थेत दिसली. यानंतर नवरदेवाला आणि त्याच्या कुटुंबीयांच्या सर्व बाब लक्षात आली. खोटे लग्न करुन तरुणांची लूट करणारी गँग असल्याचे कळताच सर्वांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. वराच्या कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे आरोपी पकडले आणि लग्नाच्या नावाखाली लूटमार आणि फसवणुकीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.