Mumbai Crime : क्षुल्लक कारणातून वाद विकोपाला गेला, शेजाऱ्यांनी जे केलं ते पाहून अंगावर काटा येईल !

| Updated on: Sep 01, 2023 | 9:30 AM

शेजाऱ्यांमध्ये क्षुल्लक कारणातून वाद होत होता. अखेर सर्व शेजाऱ्यांनी मिळून 45 वर्षीय इसमाला अद्दल घडवली. यावेळी जे घडलं त्याने मुंबीत खळबळ उडाली.

Mumbai Crime : क्षुल्लक कारणातून वाद विकोपाला गेला, शेजाऱ्यांनी जे केलं ते पाहून अंगावर काटा येईल !
क्षुल्लक कारणातून शेजाऱ्याने शेजाऱ्याला संपवले
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई / 1 सप्टेंबर 2023 : क्षुल्लक वादातून शेजाऱ्यांनी एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील मालाड परिसरात घडली. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन महिलेसह पाच आरोपींना अटक केली आहे. एजाज अब्दुल वासार शेख असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर मन्सूर सय्यद अफसर अली उर्फ सिट्टी, साबीर बाबू अन्सारी, अकबर अमीन हसन अन्सारी, यास्मिन तौहीन खान आणि रेश्मा मनसूद सय्यद अशी अटक आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपींना 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

क्षुल्लक वादातून शेजाऱ्यांकडून हत्या

मालाडमधील मालवणी परिसरातील अंबुजवाडी येथे मयत एजाज अब्दुल वासार शेख हे राहत होते. शेख यांचे येण्या-जाण्यावरून रोज शेजाऱ्यांशी भांडण होत असे. नेहमीप्रमाणे 30 ऑगस्ट रोजी एजाजचे पुन्हा शेजाऱ्यांशी भांडण झाले. या भांडणातून शेजाऱ्यांनी मिळून एजाजला काठ्या, रॉड, लाथा-बुक्क्यांनी इतका मारहाण केली. या मारहाणीत एजाज गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पाचही आरोपींना 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

यानंतर एजाज यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन मालवणी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट 11 ने पाच आरोपींना अटक करत न्यायाललयात हजर केले. न्यायालयाने सर्व आरोपींना अटक केली आहे. आरोपी मन्सूर सय्यद अफसर अली उर्फ सिट्टी याला अक्सा मालाड पश्चिम येथून अटक केली तर अन्य 4 आरोपी साबीर बाबू अन्सारी, अकबर अमीन हसन अन्सारी, यास्मिन तौहीन खान आणि रेश्मा मनसूद सय्यद यांना मालवणी परिसरातून अटक केली आहे.