Jaipur-Mumbai Express Firing : जयपूर-मुंबई एक्सप्रेसमधील गोळीबार प्रकरण, चौथ्या मृतदेहाची ओळख पटली !

| Updated on: Aug 02, 2023 | 9:49 AM

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये आरपीएफ कॉन्स्टेबलने गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत आरपीएफ एएसआयसह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला.

Jaipur-Mumbai Express Firing : जयपूर-मुंबई एक्सप्रेसमधील गोळीबार प्रकरण, चौथ्या मृतदेहाची ओळख पटली !
जयपूर-मुंबई एक्सप्रेस गोळीबारातील चौथ्या मृतदेहाची ओळख पटली
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई / 2 ऑगस्ट 2023 : जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये सोमवारी पहाटे झालेल्या गोळीबारात आरपीएफच्या ASI सह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. यातील तिसऱ्या प्रवाशाचीही ओळख पटली आहे. तिसरा मयत प्रवासी हा हैदराबाद येथील रहिवासी आहे. सय्यद सैफुद्दीन तिसऱ्या मयत प्रवाशाचे नाव आहे. मृतक एमआयएमशी संबंधित असल्याची माहिती मिळते. सय्यदचे कुटुंबीय मुंबईत दाखल झाले असून, मृतदेह हैदराबादला नेण्यात येणार आहे. सय्यद हे अजमेर शरीफहून परतत होते. मात्र घरी पोहचण्याआधीच त्यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली. अखेर तिसऱ्या प्रवाशाची ओळख पटवण्यास यश आले आहे.

अजमेर शरीफहून परतत होते

सय्यद यांचे कुटुंब मुळचे कर्नाटकातील बिदरमधील रहिवासी असून, कामानिमित्त ते गेल्या 15 वर्षांपासून हैदराबाद येथे राहतात. सय्यद यांचे हैदराबाद येथे मोबाईल दुरुस्तीचे दुकान आहे. ते राजस्थानमधील अजमेर शरीफ येथे गेले होते. तेथून जयपूर-मुंबई एक्सप्रेसने ते मुंबईकडे प्रवास करत होते. सय्यद यांना तीन मुली आहेत. सय्यद यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

हा दहशतवादी हल्ला – वारीस पठाण

दरम्यान, सय्यद यांच्या तिन्ही मुलींना 25 लाख रुपये द्यावी अशी मागणी कुटुंबासह हैदराबादचे आमदार जाफर हुसेन यांनी केली आहे. तर हा दहशतवादी हल्ला आहे, आरोपीचे मोबाईल आणि गॅझेट तपासा अशी मागणी एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा