Mumbai Murder : कांदिवलीत जुन्या वादातून तरुणाची हत्या, सहा आरोपींना अटक

| Updated on: Jul 28, 2022 | 9:18 PM

मयत दीपक राजभर हा बिहारी टेकडी पोईसर येथील रहिवासी असून त्याचे दहा दिवसांपूर्वी आरोपींसोबत भांडण झाले. यावेळी सर्वांनी एकमेकांना मारहाणही केली होती.

Mumbai Murder : कांदिवलीत जुन्या वादातून तरुणाची हत्या, सहा आरोपींना अटक
कांदिवलीत जु्न्या वादातून तरुणाची हत्या
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : जुन्या वादातून धारदार हत्याराने वार करुन एका तरुणाची हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना कांदिवली पूर्वेतील पोईसरमध्ये ही घटना घडली आहे. दीपक राजभर (30) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्या पोलिसांनी सहा आरोपींना अटक (Arrest) केली आहे. जुन्या वादा (Old Dispute)च्या रागातून ही हत्या झाल्याची माहिती कळते. आरोपी आणि मयत तरुण एकमेकांना ओळखतात. दरम्यान, आरोपी आणि मयतामध्ये नेमक्या कोणत्या कारणावरुन वाद झाला होता, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

जुन्या वादातून तरुणाची हत्या

मयत दीपक राजभर हा बिहारी टेकडी पोईसर येथील रहिवासी असून त्याचे दहा दिवसांपूर्वी आरोपींसोबत भांडण झाले. यावेळी सर्वांनी एकमेकांना मारहाणही केली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र हे भांडण कोणत्या कारणावरुन झाले होते हे अद्याप कळू शकले नाही. याचाच राग मनात धरुन आरोपींनी धारदार हत्याराने वार करुन दीपकची हत्या केली. समतानगर पोलिसांना 25 जुलै रोजी परिसरात एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता मृतदेहाच्या अंगावर जखमेच्या खुणा होत्या. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला.

पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता हा मृतदेह बिहारी टेकडी परिसरात राहणाऱ्या दीपक राजभरचा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हत्येचा तपास सुरु केला. तपासाअंती दीपकच्या ओळखीतील व्यक्तींनीची त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. अधिक तपास केला असता पोलिसांना आरोपींची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सहाही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सध्या पोलीस सर्व संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. (Youth killed due to old dispute in Kandivali, six accused arrested)

हे सुद्धा वाचा