पतीच्या जाचाला कंटाळून विवाहिता माहेरी, चारित्र्याच्या संशयातून पतीकडून हत्या

| Updated on: Dec 23, 2021 | 7:44 AM

पती विलास याच्या त्रासामुळे मागील एक-दीड वर्षांपासून बक्षिता ही आपल्या दोन मुलांसोबत माहेरी नेहरु वार्डात राहायला आली होती. मात्र काही दिवसांपूर्वी पती विलास हा बक्षिताकडे राहायला आला.

पतीच्या जाचाला कंटाळून विवाहिता माहेरी, चारित्र्याच्या संशयातून पतीकडून हत्या
भंडाऱ्या महिलेची गळा आवळून हत्या
Follow us on

तेजस मोहतुरे, टीव्ही9 मराठी, भंडारा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीच्या संशयी स्वभावाला कंटाळून विवाहिता दीड वर्षांपासून माहेरी राहत होती. मात्र आरोपीने तिच्या घरी येऊन तिचा खून केल्याचा आरोप आहे. भंडारा जिल्ह्यात हा प्रकार घडल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

भंडारा जिल्ह्यात मेंढा गावातील नेहरु वार्डात राहणाऱ्या बक्षिता हिचा विवाह पांढराबोडी येथील विलास मेश्राम याच्यासोबत झाला होता. लग्न झाल्यावर काही वर्षांनंतर विलास हा पत्नी बक्षीता हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडत होते.

नवऱ्याच्या जाचामुळे विवाहिता माहेरी

पती विलास याच्या त्रासामुळे मागील एक-दीड वर्षांपासून बक्षिता ही आपल्या दोन मुलांसोबत माहेरी नेहरु वार्डात राहायला आली होती. मात्र काही दिवसांपूर्वी पती विलास हा बक्षिताकडे राहायला आला.

चारित्र्यावर संशय घेत गळा आवळला

त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वादावादी सुरु झाली. यातच पती विलासने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली.

संबंधित बातम्या :

सांगलीत साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याची आईकडून हत्या; वाचा असे काय घडले की पोटच्या गोळ्यालाच संपवले

हरियाणात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, पत्नी-मुलासह पित्याने लावला गळफास, वाचा नेमके काय घडले?

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार