लग्न 4 दिवसांवर असताना तरुणीचं अपहरण, भिगवणमध्ये तणाव, आता त्याच तरुणीचा व्हिडीओ समोर; म्हणाली मी स्वत: …

भिगवण येथे एका तरुण मुलीचे अपहरण करण्यात आल्याचे सांगितले जात होते. लग्न दोन दिवसांवर आलेले असताना अपहरण झाल्याच्या दाव्याने खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी तरुणीचा व्हिडीओ समोर आला आहे.

लग्न 4 दिवसांवर असताना तरुणीचं अपहरण, भिगवणमध्ये तणाव, आता त्याच तरुणीचा व्हिडीओ समोर; म्हणाली मी स्वत: ...
BHIGWAN WOMEN CRIME
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 18, 2026 | 7:41 PM

सांगली जिल्ह्यातील भिगवण येथे एका तरुणीचे अपहरण केल्याची धक्कादायक दावा केला जात होता. आई आणि भावासोबत लग्नाची खरेदी करुन घराकडे जात असताना तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून हे अपहरण करण्यात आल्याचा दावा केला जात होता. विशेष म्हणजे मुलीचे लग्न चार दिवसांवर आलेले असताना हे कृत्य करण्यात आले आहे, असे म्हटले जात होते. याबाबत आता वेगळी आणि प्रकरणाला कलाटणी देणारी माहिती समोर आली असली तरी भिगवण येथे मात्र काही काळासाठी तणावाची स्थिती झाली होती.

नेमकं काय घडलं?

भिगवण येथे एक तरुणी आपला भाऊ तसेच आईसोबत लग्नाची खरेदी करुन घरी जात होती. त्याच वेळी आरोपी आयान शेख आणि अजहर शेख यांनी गाडी आडवून डोळ्यात चटणी फेकली. तरुणीच्या आईने तसेच भावाने अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन तरुणीला छोटा हत्ती गाडी आणि दुचाकीवर घेऊन गेल्याचा दावा केला जात होता.

भिगवणमध्ये वातावरणात तणाव

हे कथित प्रकरण समोर आल्यानंतर भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी या प्रकरणी भिगवणला जात या प्रकरणी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली. मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ तयार करून नातेवाईकांना, पोलिसांना पाठवला जातोय. मुलीचे लग्न पुढच्या दोन-चार दिवसात होते. अशा परिस्थितीमध्ये मुलीचे अपहरण केले आहे, असा दावा पडळकर यांनी केला होता.

सत्य आलं समोर

दरम्यान, पडळकर यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर भिगवण येथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. तेथील नागरिकांनी भिगवण बंदची हाक दिली होती. तसेच या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनीही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परंतु आता या प्रकरणी मोठा ट्विस्ट समोर आला आहे. ज्या तरुणीचे अपहरण करण्यात आले आहे, असा दावा केला जात होता, त्या मुलीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत मी संबंधित मुलासोबत माझ्या मर्जीने पळून गेले होते, असे ती सांगत आहे. सोबतच माझे संबंधित मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचेही त्या मुलीने सांगितले आहे. त्यामुळे आता या कथित अपहरणाच्या प्रकरणाावर पडदा पडणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.