मृत्यूशी झुंज अपयशी ठरली! हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू, शहरात उडाली खळबळ…

| Updated on: Dec 15, 2022 | 1:59 PM

समीर पठाण याच्या डोक्यात आणि मानेवर धारधार शस्राने वार करण्यात आले होते, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

मृत्यूशी झुंज अपयशी ठरली! हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू, शहरात उडाली खळबळ...
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : नाशिक शहरातील लॅम रोड परीसरात समीर पठाण या तरूणावर जुन्या भांडणाची कुरापत काढून हल्ला करण्यात आला होता. या तरुणाला वाचविण्यासाठी गलेल्या मित्रावरूनही संशयितांनी हल्ला केल्यानं तो जखमी झाला होता. त्याच्या तक्रारीवरुन नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात गंभीर बाब म्हणजे समीर पठाण यांच्या संपूर्ण शरीरावर वार झाले होते. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. 13 दिवसांपासून या तरूणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 2 डिसेंबर पासून समीर याच्यावर उपचार सुरू होते, मात्र 13 दिवसांनी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संशयित आरोपी सर्व पोलीसांच्या ताब्यात असून अधिकचा तपास केला जात आहे. नाशिक शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असतांना समीर पठाण यांच्यावर मित्रांनीच जुन्या भांडणाची कुरापत काडून हल्ला केल्याचे समोर आले होते.

समीर पठाण याच्या डोक्यात आणि मानेवर धारधार शस्राने वार करण्यात आले होते, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

नाशिक शहरातील नाशिकरोड पोलीस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल असला तरी दुसरीकडे समीर याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून हळहळ व्यक्त केले जात आहे.

हे सुद्धा वाचा

मित्रासोबत बाहेर असतांना तीन ते चार जणांनी अचानक हल्ला केल्याने गावकऱ्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला होता, पण हल्लेखोरांनी त्यांनाही जखमी केले आहे.

नाशिक शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असतांना हल्ल्याची घटना घडल्यानंतर उपचारा दरम्यान समीर पठाण यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.